शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Rajiv Satav: २०१४ च्या मोदी लाटेतही फडकवला होता काँग्रेसचा झेंडा; राजीव सातव यांच्या विजयाची गोष्ट

By प्रविण मरगळे | Published: May 16, 2021 1:23 PM

Congress MP Rajiv Satav Passed Away: राजीव सातव हे अत्यंत मनमिळाऊ आणि उमदं असं नेतृत्व होतं. सातव यांच्या साधेपणामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची इतकी मोठी जबाबदारी असूनही मतदारसंघात त्यांनी घट्ट पाय रोवले होते.

ठळक मुद्देमाजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. परंतु त्यानंतर राजीव सातव यांनी कधीही राजकारणात मागे वळून पाहिलं नाहीस्वकर्तृत्वावर राजीव सातव यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला. २००९ मध्ये आमदार म्हणून कळमनुरी मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला.

प्रविण मरगळे/विजय नपाते

मुंबई – काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी पहाटे पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सातव यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोकप्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जायचे. राजीव सातव यांच्या जाण्यानं मी माझा मित्र गमावला अशा भावना व्यक्त करत राहुल गांधींना दु:ख अनावर झालं.

राजीव सातव हे अत्यंत मनमिळाऊ आणि उमदं असं नेतृत्व होतं. सातव यांच्या साधेपणामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची इतकी मोठी जबाबदारी असूनही मतदारसंघात त्यांनी घट्ट पाय रोवले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजीव सातव हे कळमनुरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. माजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. परंतु त्यानंतर राजीव सातव यांनी कधीही राजकारणात मागे वळून पाहिलं नाही. स्वकर्तृत्वावर राजीव सातव यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला. 

२००९ मध्ये आमदार म्हणून कळमनुरी मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला. या निवडणुकीत राजीव सातव यांनी शिवसेनेच्या गजानन घुगेंचा ८ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात बांधणीला सुरूवात केली. याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी काळात हिंगोली मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत होता. त्यामुळे राजीव सातव यांना उमेदवारी मिळेल का नाही? याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. परंतु राजीव सातव यांनी या चर्चांकडे दुर्लक्ष करत मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेणे. संपर्क वाढवण्याचं काम सुरूच ठेवलं. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील या लोकसभेच्या खासदार होत्या. त्यानंतर शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंनी त्यांचा पराभव केला होता. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट होती. या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तडजोडीत हिंगोली मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीकडून मागून घेतला. तेव्हा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर पक्षातंर्गत टीकाही झाली होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने राजीव सातव यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा पराभव करत लोकसभेत विजय मिळवला. अवघ्या १ हजार ६३२ मतांनी राजीव सातव यांना विजय मिळाला होता. परंतु मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे २ खासदार निवडून आले होते त्यात राजीव सातव यांचं नाव होतं. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून माघार   २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. याचं कारण असं की, राजीव सातव हे राहुल गांधींचे विश्वासू शिलेदार होते. २०१९ च्या निवडणुकीत राजीव सातव यांच्यावर गुजरात, दीव दमण या राज्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी आली. त्याचसोबत पंजाब येथील निवडणुकीतही त्यांना लक्ष घालण्यास सांगितलं होतं. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने राजीव सातव यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षीय कामातून मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ नये या विचाराने राजीव सातव यांनी पक्षसंघटनेला जास्त महत्त्व दिलं. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राजीव सातव यांनी केलेल्या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होमपिचवर सातव यांनी भाजपाला घाम फोडला होता. त्यामुळे राजीव सातव यांच्या अचानक जाण्याने काँग्रेससाठी खूप मोठी हानी म्हणता येईल.

टॅग्स :Rajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली