शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपाला इशारा; “महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ झाल्यास...”

By प्रविण मरगळे | Updated: February 9, 2021 08:59 IST

Nana Patole Target Devendra Fadnavis: काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फुटले जाण्याची चर्चा आहे, परंतु भाजपाने स्वत:चे आमदार सांभाळावे, जी काही रणनीती असेल ती करावी

ठळक मुद्देएकेकाळी अंडरवर्ल्डची दहशत होती, दबावात आणून ते सेलिब्रिटीला हवं तसं वागायला लावत होतेशेती प्रश्नाची ज्यांना ABC माहिती नाही अशा रेल्वे मंत्र्यांना शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला लावणं हा विश्वासघात आहे.लोकांना विचलित करण्याचं काम भाजपा नेहमी करतात. सत्तेत बसणाऱ्यांनी देशासमोर जे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यावे

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. जास्त दिवस विरोधी पक्षात राहायचं नाही असं विधान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, या विधानावरून काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांना समाचार घेतला आहे.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत, ते फक्त बोलण्यात एक्सपर्ट आहेत, मी भविष्यकार नाही, ते जास्त पाहतात. पण महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाल्यास महाराष्टातून भाजपा संपुष्टात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच शिवसेना-भाजपा यांच्यात बंद खोलीत जे झालं त्याबद्दल बोलणार नाही. मात्र सव्वा वर्ष झाली आणि अमित शहा आज बोलतायेत, शेतकरी, महागाई, बेरोजगारी असे विविध प्रश्न आहेत, त्यावरून लोकांना विचलित करण्याचं काम भाजपा नेहमी करतात. सत्तेत बसणाऱ्यांनी देशासमोर जे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यावे असं पटोलेंनी सांगितले. (Congress Nana Patole Criticized BJP Devendra Fadnavis)

पंतप्रधान, गृहमंत्री खोटं बोलतात

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना नरेंद्र मोदींनी राज्यसभेत जे सांगितलं त्याने आश्चर्य वाटलं, मन की बात सारखं संसदेत भाषण करतात, जीएसटी कायद्याला भाजपाने विरोध केला होता, मात्र त्यांच्या फायद्याचं आहे अशाप्रकारे जीएसटी कायदा आणला. काही लोकांच्या फायद्यासाठी कृषी कायदा आणला आहे. शेती प्रश्नाची ज्यांना ABC माहिती नाही अशा रेल्वे मंत्र्यांना शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला लावणं हा विश्वासघात आहे. पंतप्रधान, गृहमंत्री खोटं बोलतात हे जनतेला माहिती आहे. शेतकऱ्यांना सभागृहातून आवाहन करण्यापेक्षा स्वत: तुम्ही चर्चेला जावं असं नाना पटोले म्हणाले.

अंडरवर्ल्डसारखं भाजपा काम करतेय

एकेकाळी अंडरवर्ल्डची दहशत होती, दबावात आणून ते सेलिब्रिटीला हवं तसं वागायला लावत होते, मात्र आज भाजपा सरकार अंडरवर्ल्ड सारखं काम करत आहे, मूळ मुद्दयावरून लक्ष हटवण्यासाठी सेलिब्रिटींना ट्विट करायला लावलं, पण कोणत्याही दबावाला झुकून सेलिब्रिटींनी अशाप्रकारे ट्विट करणं योग्य नाही. देश त्यांच्याकडे आयकॉन म्हणून पाहतो, त्यांनी मर्यादेत राहावं असंही पटोलेंनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध परंपरा कायम राहावी

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, मात्र यासाठी भाजपा रणनीती आखत आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फुटले जाण्याची चर्चा आहे, परंतु भाजपाने स्वत:चे आमदार सांभाळावे, जी काही रणनीती असेल ती करावी, परंतु विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची बिनविरोध परंपरा कायम राहावी असं विधान नाना पटोलेंनी केले.

उपमुख्यमंत्रिपदाची मागणी नाही

काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद मागत नाही, ओबीसी नेते उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक नाहीत, ही जनतेची मागणी असेल तर त्याला पक्ष म्हणून आम्ही रोखू शकत नाही. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना जो किमान समान कार्यक्रम ठरला त्यानुसार सरकार पुढे वाटचाल करेल असं सांगत नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील हे स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहाShiv Senaशिवसेना