शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

"मोदींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष, आता झोळी घेऊन निघून जाण्याची आलीय वेळ" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:29 IST

Congress Ragini Nayak And PM Narendra Modi : काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,069 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,321 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,91,981 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, लसीकरण यावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. अनेकांनी विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका सध्या चर्चेचा विषय झाला आहे. याच विषयावर एका वाहिनीने घेतलेल्या चर्चासत्रादरम्यान काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली आहे. 

"मोदींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष, आता झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे " असा सणसणीत टोला काँग्रेसने मोदी सरकारला लगावला आहे. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल असा प्रश्न या चर्चेदरम्यान विचारला असता त्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक (Ragini Nayak) यांनी उत्तर दिलं आहे यावेळी "मोदीजींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष अशी अवस्था भारतीय जनता पार्टीची झाली आहे. भाजपाशासित भागांमध्ये गोंधळ माजला आहे. मोदींना ना कोरोना आवरता येतोय ना सत्ता. असं वाटतंय की आता झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे" असं नायक यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेसच्या रागिणी नायक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील याबाबत एक ट्विट केलं आहे. उत्तर प्रदेशमधील राजकीय गोंधळावर भाष्य केलं आहे. "योगी आणि मोदी दोघेही एकमेकांवर वरचढ ठरू पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं एकमेकांशी पटेना. भाजपाशासित राज्यांमध्ये नुसता गोंधळ माजला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्व एकमेकांवर वरचढ ठरू पाहत आहेत. कोरोना असो नाहीतर सत्ता दोन्हीही मोदीजींच्या हाताबाहेर जाऊ लागलेत. आता असं वाटतंय की बहुतेक झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आलेली आहे" असं देखील रागिणी नायक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"भाजपात जाणं ही खूप मोठी चूक"; मुंडण आणि शुद्धीकरण करून 200 कार्यकर्त्यांचा TMC मध्ये प्रवेश 

विधानसभा निवडणुकांनंतर बंगालचं राजकारण ढवळून निघालं. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आहे. याच दरम्यान हुगळी जिल्ह्यात जवळपास 200 कार्यकर्त्यांनी भाजपामधून बाहेर पडत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घटना घडली आहे. कार्यकर्त्यांनी गंगाजलने आपलं शुद्धीकरण करुन घेतलं. भाजपामध्ये प्रवेश करणं आपली खूप मोठी चूक होती असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तसेच त्यांना आपल्या या चुकीसाठी मुंडण करुन घेत आणि गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुगळी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचा झेंडा हाती घेतला आणि स्थानिक खासदारांना पाठिंबा दर्शवला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्या