शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

OBC Reservation: “जनगणनेत ८ कोटी चुका नाहीत, फडणवीस दिशाभूल करतायत”; चव्हाणांनी केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 6:30 PM

OBC Reservation: जनगणनेत ८ कोटी चुका असल्याचा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यांत अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या जातीनिहाय आणि आर्थिक जनगणनेत ८ कोटी चुका असल्याचा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरून टीका केली असून, देवेंद्र फडणवीस दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे. (congress prithviraj chavan criticises bjp devendra fadnavis on obc reservation data)

अलीकडेच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावर बोलताना सन २०११ मध्ये केंद्र सरकारने एसईसीसी जनगणनेत ८ कोटी चुका असून, एकट्या महाराष्ट्रात ६९ लाख चुका आहेत, असे म्हटले होते. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यातील फोलपणा उघडकीस आणला आहे. 

झोटिंग समिती फास होता, एकनाथ खडसेंना केवळ त्रास होता; नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची दिशाभूल केली

केंद्र सरकारनेच संसदीय समिती समोर दिलेल्या माहितीनुसार ९९% एसईसीसी डेटा त्रुटीरहित आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची आकडेवारी सांगून जाणीवपूर्वक सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केली, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. दुर्दैवाने फडणवीस यांनी एसईसीसी जनगणनेतील चुकांचा आकडा फुगवून सांगितला आणि सभागृहातील ओबीसी आरक्षण अशा अत्यंत महत्वाच्या विषयावरील चर्चा भरकटवली, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. 

सन २०१६ मध्ये जनगणनेचे काम संपले

२०१० मध्ये यूपीए सरकारने जातनिहाय आणि आर्थिक जनगणना (एसईसीसी) करण्याचे ठरवले होते. त्यानुसार २९ जून २०११ रोजी काम सुरू झाले. या जनगणनेचे काम २०१६ मध्ये पूर्ण झाले. रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर तसेच केंद्रीय गृहमंत्रालयानुसार, एसईसीसीच्या जनगणनेतील सर्व माहितीचे विश्लेषण झाले आहे आणि ९८.८७ टक्के व्यक्तींच्या डेटामध्ये कोणतीही त्रुटी नाही, असे सांगण्यात आले आहे. 

“कोण कौरव, कोण पांडव हे त्यांनीच ठरवावं”; पंकजा मुंडेंना काँग्रेसचा टोला

दरम्यान, एसईसीसी मध्ये एकूण लोकसंख्या ११८,६३,०३,७७० एवढी नोंदवली आहे. त्यापैकी १,३४,७७,०३० एवढ्या नोंदीमध्ये काही चुका आढळल्या आहेत. संपूर्ण देशासाठी हे प्रमाण फक्त १.१३ टक्के आहे. सदर चुका दुरुस्त करण्यासाठी COTS ही प्रक्रियादेखील अनेक राज्यात राबवली गेली. या प्रक्रियेअंतर्गत उत्तर प्रदेशातील २,०९,१८२ तर राजस्थानातील ४५,५५० चुका दुरुस्त करण्यात आल्या, असे यात म्हटले आहे.  

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण