शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

हुकूमशहा राज्यकर्त्यांच्या अहंकाराचा पराभव; सोनिया गांधींचा पीएम मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 19:37 IST

"तब्बल 12 महिन्यांच्या गांधीवादी आंदोलनानंतर, आज देशातील 62 कोटी अन्नदात्यांच्या-शेतकऱ्यांच्या-शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे."

जवळपास वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची मेहनत फळाला आली आणि आज मोदी सरकारने ते तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर, आता मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

सोनिया गांधी यांनी हा अन्नदात्याचा विजय आणि सरकारच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटले आहे. या निर्णयावर आनंद व्यक्त करताना सोनिया गांधी म्हणाल्या, तब्बल 12 महिन्यांच्या गांधीवादी आंदोलनानंतर, आज देशातील 62 कोटी अन्नदात्यांच्या-शेतकऱ्यांच्या-शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे. त्या म्हणाल्या, आज 700 हून अधिक शेतकरी कुटुंबांचे बलिदान यशस्वी ठरले. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे.

हुकूमशहा राज्यकर्त्यांच्या अहंकाराचा पराभव -केंद्र सरकारवर हल्ला चढवत सोनिया गांधी म्हणाल्या, 'आज सत्तेतील लोकांनी शेतकऱ्यांविरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा आणि हुकूमशाही राज्यकर्त्यांच्या अहंकाराचाही पराभव झाला. आज रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कटही फसला. आज तिन्ही काळे शेतीविरोधी कायदे पराभूत झाले आणि अन्नदाता जिंकला.

एनडीए सरकार शेतकरी विरोधी असल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच, गेल्या सात वर्षांत भाजप सरकारने शेतीवर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केले आहेत. मग, भाजपचे सरकार येताच शेतकऱ्याला दिला जाणारा बोनस बंद करण्याचा मुद्दा असो किंवा अध्यादेश आणून शेतकऱ्याच्या जमिनीचा न्याय्य मोबदला कायदा संपवण्याचा डाव असो, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीcongressकाँग्रेसBJPभाजपा