शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

हुकूमशहा राज्यकर्त्यांच्या अहंकाराचा पराभव; सोनिया गांधींचा पीएम मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 19:37 IST

"तब्बल 12 महिन्यांच्या गांधीवादी आंदोलनानंतर, आज देशातील 62 कोटी अन्नदात्यांच्या-शेतकऱ्यांच्या-शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे."

जवळपास वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची मेहनत फळाला आली आणि आज मोदी सरकारने ते तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर, आता मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

सोनिया गांधी यांनी हा अन्नदात्याचा विजय आणि सरकारच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटले आहे. या निर्णयावर आनंद व्यक्त करताना सोनिया गांधी म्हणाल्या, तब्बल 12 महिन्यांच्या गांधीवादी आंदोलनानंतर, आज देशातील 62 कोटी अन्नदात्यांच्या-शेतकऱ्यांच्या-शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे. त्या म्हणाल्या, आज 700 हून अधिक शेतकरी कुटुंबांचे बलिदान यशस्वी ठरले. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे.

हुकूमशहा राज्यकर्त्यांच्या अहंकाराचा पराभव -केंद्र सरकारवर हल्ला चढवत सोनिया गांधी म्हणाल्या, 'आज सत्तेतील लोकांनी शेतकऱ्यांविरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा आणि हुकूमशाही राज्यकर्त्यांच्या अहंकाराचाही पराभव झाला. आज रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कटही फसला. आज तिन्ही काळे शेतीविरोधी कायदे पराभूत झाले आणि अन्नदाता जिंकला.

एनडीए सरकार शेतकरी विरोधी असल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच, गेल्या सात वर्षांत भाजप सरकारने शेतीवर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केले आहेत. मग, भाजपचे सरकार येताच शेतकऱ्याला दिला जाणारा बोनस बंद करण्याचा मुद्दा असो किंवा अध्यादेश आणून शेतकऱ्याच्या जमिनीचा न्याय्य मोबदला कायदा संपवण्याचा डाव असो, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीcongressकाँग्रेसBJPभाजपा