शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 14:49 IST

काही अपक्ष आमदार काँग्रेसला समर्थन देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांनी आम्ही अशोक गहलोत यांच्यासोबत आहोत असं सांगितले आहे

ठळक मुद्देराज्यसभेच्या ३ जागांवरुन राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेगभाजपाकडून काँग्रेस आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपकाँग्रेस सरकार स्थिर, कोणताही आमदार फुटणार नाही - मुख्यमंत्री अशोक गहलोत

जयपूर – राज्यसभेच्या ३ जागांसाठी निवडणुकीपूर्वीच राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने त्यांच्या आमदारांना बुधवारी जयपूरच्या एका हॉटेलमध्ये थांबवले आहे. आमदार भाजपाच्या संपर्कात येऊ नये यासाठी काँग्रेसने ही खबरदारी घेतली आहे. याचदरम्यान वसुंधरा राजे यांच्या संपर्कात असलेल्या अपक्ष आमदारांवरही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नजर ठेवली आहे.

काही अपक्ष आमदार काँग्रेसला समर्थन देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांनी आम्ही अशोक गहलोत यांच्यासोबत आहोत असं सांगितले आहे. वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीय असल्याचं विचारलं असता त्यांनी वेळेसोबत निर्णय घ्यावे लागतात असं सांगितले. तसेच त्यांनी पैशांची ऑफर असल्याचाही नकार दिला.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस आमदारांना पैसे ऑफर देण्यावरुन विचारले असता त्यांनी मला माहिती नाही, कोणत्या आमदाराला कोण ऑफर देत आहे, पण असं असेल तर याची चौकशी व्हायला हवी. काँग्रेस आमदार एकत्र आहेत असं त्यांनी स्पष्ट केले. काही सचिन पायलट समर्थक आमदार नाराज असल्याची चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम दिला. राज्यसभा निवडणुकीत सर्व आमदार एकत्र आहोत, कोणीही नाराज नाही, मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्षही आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं ते म्हणाले.

सचिन पायलट यांचे निकटवर्तीय आमदार राकेश पारीख यांनी सांगितले की, रिसोर्टमध्ये ठेवण्याची गरज नाही, आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. आम्ही आमच्या नेत्यासोबत आहोत, हा नेता कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे असं म्हणाले. यापूवी बुधवारी रात्री मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस पक्षाचे आमदार एकत्र असून ते कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाहीत असं सांगितले. त्यांनी भाजपावर काँग्रेसचे आमदार विकत घेण्याचा घोडेबाजार करत असल्याचा आरोपही केला.

दरम्यान, आमचे आमदार प्रामाणिक आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांना अनेक ऑफर देण्याचा प्रयत्न केला गेला, पण हे भारतातील एकमेव राज्य आहे ज्याठिकाणी पैशाने व्यवहार होत नाहीत. इतिहासातही असं काही सापडणार नाही. मला गर्व आहे मी अशा राज्याचा मुख्यमंत्री आहे ज्याठिकाणी कोणताही व्यवहार आणि अमिषाच्या लालसेपोटी सरकारची साथ न सोडणारी माणसं आहेत. राज्यात सरकार स्थिर राहील असं मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा