शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 14:49 IST

काही अपक्ष आमदार काँग्रेसला समर्थन देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांनी आम्ही अशोक गहलोत यांच्यासोबत आहोत असं सांगितले आहे

ठळक मुद्देराज्यसभेच्या ३ जागांवरुन राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेगभाजपाकडून काँग्रेस आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपकाँग्रेस सरकार स्थिर, कोणताही आमदार फुटणार नाही - मुख्यमंत्री अशोक गहलोत

जयपूर – राज्यसभेच्या ३ जागांसाठी निवडणुकीपूर्वीच राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने त्यांच्या आमदारांना बुधवारी जयपूरच्या एका हॉटेलमध्ये थांबवले आहे. आमदार भाजपाच्या संपर्कात येऊ नये यासाठी काँग्रेसने ही खबरदारी घेतली आहे. याचदरम्यान वसुंधरा राजे यांच्या संपर्कात असलेल्या अपक्ष आमदारांवरही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नजर ठेवली आहे.

काही अपक्ष आमदार काँग्रेसला समर्थन देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांनी आम्ही अशोक गहलोत यांच्यासोबत आहोत असं सांगितले आहे. वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीय असल्याचं विचारलं असता त्यांनी वेळेसोबत निर्णय घ्यावे लागतात असं सांगितले. तसेच त्यांनी पैशांची ऑफर असल्याचाही नकार दिला.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस आमदारांना पैसे ऑफर देण्यावरुन विचारले असता त्यांनी मला माहिती नाही, कोणत्या आमदाराला कोण ऑफर देत आहे, पण असं असेल तर याची चौकशी व्हायला हवी. काँग्रेस आमदार एकत्र आहेत असं त्यांनी स्पष्ट केले. काही सचिन पायलट समर्थक आमदार नाराज असल्याची चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम दिला. राज्यसभा निवडणुकीत सर्व आमदार एकत्र आहोत, कोणीही नाराज नाही, मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्षही आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं ते म्हणाले.

सचिन पायलट यांचे निकटवर्तीय आमदार राकेश पारीख यांनी सांगितले की, रिसोर्टमध्ये ठेवण्याची गरज नाही, आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. आम्ही आमच्या नेत्यासोबत आहोत, हा नेता कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे असं म्हणाले. यापूवी बुधवारी रात्री मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस पक्षाचे आमदार एकत्र असून ते कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाहीत असं सांगितले. त्यांनी भाजपावर काँग्रेसचे आमदार विकत घेण्याचा घोडेबाजार करत असल्याचा आरोपही केला.

दरम्यान, आमचे आमदार प्रामाणिक आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांना अनेक ऑफर देण्याचा प्रयत्न केला गेला, पण हे भारतातील एकमेव राज्य आहे ज्याठिकाणी पैशाने व्यवहार होत नाहीत. इतिहासातही असं काही सापडणार नाही. मला गर्व आहे मी अशा राज्याचा मुख्यमंत्री आहे ज्याठिकाणी कोणताही व्यवहार आणि अमिषाच्या लालसेपोटी सरकारची साथ न सोडणारी माणसं आहेत. राज्यात सरकार स्थिर राहील असं मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा