शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये नाराजी; 'अर्थ'पूर्ण मुद्द्यांवरून तक्रारी

By कुणाल गवाणकर | Updated: November 18, 2020 18:44 IST

खात्यांना निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे मंत्री नाराज

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार प्रयत्न करूनही निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याचं समजतं. काँग्रेसच्या खात्यांना निधी, पॅकेज मिळत नाहीत. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष फटका काँग्रेसला बसत असून जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचं काँग्रेसच्या मंत्र्याचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनी याबद्दल स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागांना निधी मिळतो. पण काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना निधी, पॅकेज देण्यात येत नाही, अशी काँग्रेस मंत्र्यांची तक्रार आहे. आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. 'दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएसईबीलादेखील मिळायला हवं होतं,' असं वडेट्टीवार म्हणाले.परिवहन मंत्रालय शिवसेनेकडे आहे. या खात्यासाठी दिवाळीआधी १ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मंत्रालयानं एसटी कामगारांचे तीन महिन्यांचे पगार काढले. तशाच पॅकेजची गरज ऊर्जा मंत्रालयालादेखील आहे. मात्र या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अप्रत्यक्षपणे काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 'ऊर्जा मंत्रालयाला पॅकेज मिळावं यासाठी अर्थ मंत्रालयाला ८ वेळा प्रस्ताव देण्यात आला. मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. राज्य सरकारच्या तिजोरीवर कोरोनामुळे ताण आहे. केंद्राकडून राज्याला कोणतीही मदत मिळालेली नाही,' असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.महाविकास आघाडी सरकारकडून जनतेचा विश्वासघात- फडणवीसमहाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केला आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिलात दिलासा देण्यात येईल असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यानंतरही जनतेला अवाजवी बिलं आली. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या घरातली सर्व उपकरणं २४ तास वापरल्या तरीही ५ वर्षे जितकं बिल येणार नाही, तितक्या रकमेचं बिल ३ महिन्यांसाठी आलं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.राज्यातील ऊर्जा विभागासाठी दीड ते दोन हजार कोटींचा फटका फार मोठा नाही. याशिवाय केंद्र सरकार यासाठी कर्ज देण्यास तयार होतं. मात्र राज्य सरकारनं कर्ज घेतलं नाही. त्याचा फटका राज्यातल्या जनतेला बसत आहे. एसटी महामंडळाला निधी मिळाला ही चांगली गोष्ट आहे. पण वीज मंडळालादेखील पॅकेज मिळायला हवं होतं. कोरोना काळात इतर सर्व राज्यांनी विजबिलात सूट दिली आहे. पण महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केला, अशी टीका फडणवीसांनी केली. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNitin Rautनितीन राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस