शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रशासनातले 'ते' अधिकारी रडारवर; काँग्रेसच्या बैठकीत नाराजीचा सूर; मुख्यमंत्र्यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 20:56 IST

congress leaders unhappy on ncp after allegations on anil deshmukh will meet cm uddhav thackeray: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं. या पत्राचे पडसाद थेट संसदेपर्यंत उमटले. (congress leaders unhappy on ncp after allegations on anil deshmukh will meet cm uddhav thackeray)परमबीर सिंग यांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणीअनिल देशमुख यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांची पाठराखण केली आहे. मात्र काँग्रेसमध्ये या विषयावर दोन गट आहेत. देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असा मतप्रवाह असलेला एक गट काँग्रेसमध्ये आहे. तर राजकारणात आरोप होतच असतात. त्यातही पदावरून दूर केल्यानंतर अधिकाऱ्यानं केलेल्या आरोपांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं दुसऱ्या गटाला वाटतं. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्लामहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनेकांनी राष्ट्रवादीबद्दल नाराजी व्यक्त केली. देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांच्यामुळे सरकार अडचणीत आलं आहे. त्यांची चौकशी व्हायला हवी. त्यासाठी त्यांनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. देशमुखांवर झालेल्या आरोपांमुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे, असं मत बैठकीला उपस्थित असलेल्या एका गटानं मांडलं.अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीकडून शरद पवार मैदानात उतरले आहेत. मात्र पक्षातल्या इतर कोणत्याही नेत्यानं, मंत्र्यानं देशमुख यांची बाजू मांडत त्यांचा बचाव केलेला नाही. त्यामुळेही सरकारबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे, असं मत या गटानं व्यक्त केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या मर्जीतील माणसं महत्त्वाच्या पदांवर नेमली. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्या या अधिकाऱ्यांना आधी महत्त्वाच्या पदांवरून हटवण्यात यावं, अशी मागणी एका गटानं लावून धरली. काँग्रेसचे नेते लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसAnil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवार