शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाकरे सरकारमधील 'त्या' मंत्र्यांवर काँग्रेस नेते नाराज; शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं घेऊन थेट आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:05 IST

बीड, गडचिरोलीसोबतच सोलापूर, वर्ध्यातील काँग्रेस नेत्यांचे शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर स्पष्ट आरोप

मुंबई/बीड/गडचिरोली: मित्रपक्ष खंजीर खुपसत असल्याचं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केल्यानंतर आता राज्यातील काँग्रेसच्या इतरही नेत्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर शरसंधान साधलं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं होत नसल्याचा तक्रारीचा सूर नेत्यांनी लावला आहे. नाना पटोलेंनी लोणावळ्यातल्या मेळाव्यात मित्रपक्षांबद्दलची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवल्यानंतर आता काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं करत नसल्याचा आरोप गडचिरोली काँग्रेस अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला. तर काँग्रेस किसान सेलचे प्रदेशाध्यक्षांनी बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुंडे केवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामं करतात. काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं मार्गी लावत नाहीत, असा काँग्रेस किसान सेलचे प्रदेशाध्यक्षांचा आरोप आहे. बीड, गडचिरोलीसोबतच सोलापूर, वर्ध्यातील काँग्रेस नेत्यांनीदेखील शिवसेना, राष्ट्रवादीचे मंत्री आपली कामं करत नसल्याचं म्हटलं आहे. निधी वाटपात अन्याय होत असल्याचीदेखील काँग्रेस नेत्यांची तक्रार आहे.

दोन दिवसांपूर्वी काय म्हणाले होते नाना पटोले?राज्यात काँग्रेसची स्वबळावर सत्ता येईल, मुंबई महापालिकेची निवडणूक पक्ष स्वबळावर लढवेल, अशी विधानं करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दोन दिवसांपूर्वी लोणावळ्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पटोलेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीबद्दलची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. युती अन् आघाडीची चिंता न करता कामाला लागा, शिवसेना बळकट करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या जिल्हाप्रमुखांना देतात, तेव्हा ते चालतं. पण तेच मी बोललो तर त्रास होतो, अशा शब्दांत पटोलेंनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली.

पुण्याचा पालकमंत्री आपला नाही. ते पद बारातमीवाल्यांकडे आहे. त्यांच्या माध्यमातून आपली किती कामं होतात, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. 'प्रत्येक कामात पालकमंत्र्यांची स्वाक्षरी लागते. एखाद्या समितीवर कोणाला घ्यायचं असेल तर यांची स्वाक्षरी लागते. तेव्हा ते आपल्याला मदत करतात का? तुम्हाला होत असलेला त्रास लक्षात ठेवा. त्या त्रासानं मानसिकदृष्ट्या खचून जाऊ नका. त्या त्रासालाच तुमची ताकद बनवा,' असं आवाहन करत पटोलेंनी कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवला.

'त्यांना समझोता करायचा नसेल, सोबत राहून पाठीत खंजीरच खुपसायचा असेल तर ठीक आहे. तुम्हाला आज होत असलेला त्रास लक्षात ठेवा आणि कामाला लागा. पुण्याचा पालकमंत्री आपला असेल. त्या खुर्चीवर आपला माणूस बसेल अशी शपथ घ्या. खचून जाऊ नका. कमजोर होऊ नका. मी इथला पालकमंत्री होईन असा निर्धार करा. तुम्ही आम्हाला आमचा हिस्सा देत नाही. ठीक आहे. आम्ही आमच्या कर्मानं, मेहनतीनं तो मिळवू,' अशा शब्दांत पटोलेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेEknath Shindeएकनाथ शिंदेDhananjay Mundeधनंजय मुंडेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना