शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

“विधानसभा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”; शिवसेना मंत्र्याचं विधान

By प्रविण मरगळे | Updated: February 5, 2021 09:32 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले इच्छुक होते, दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेतली

ठळक मुद्देकाँग्रेसकडून अध्यक्षपद घेऊन त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेविधानसभा अध्यक्षपद आता रिक्त असल्याने ते खुलं झालं आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विधानसभा अध्यक्षपदासाठी दावा केलाआगामी काळात विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई – काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नेत्यांची लॉबी सुरू झाली असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिला. पटोलेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यातच शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे आघाडीतला अविश्वास वाढवण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले इच्छुक होते, दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेतली, त्यानंतर गुरूवारी त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. काँग्रेसकडून अध्यक्षपद घेऊन त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, परंतु विधानसभा अध्यक्षपद आता रिक्त असल्याने ते खुलं झालं आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विधानसभा अध्यक्षपदासाठी दावा केला आहे.

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज? 

यातच शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी राज्यात मंत्री कोण होईल, विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवतील, शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे असं विधान करून काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

‘सत्तेचा फॉर्म्युला तयार, फक्त बटण दाबायची देरी' बंद दाराआड नेमकी चर्चा काय घडली?

भाजपावर केली टीका  

काही वर्षापूर्वी केंद्र सरकारने अच्छे दिन आयेंगे म्हणत आम्ही पेट्रोलचे दर कमी करू, डिझेलचे दर कमी करू, गॅस सिलेंडर दर कमी करू असं म्हणत सत्ता आणली, गेल्या ७ वर्षापासून भाजपा सत्तेवर आली, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणं म्हणजे त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होतो, त्यामुळे शिवसेनेकडून इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. हे दर कायमस्वरुपी कमी असले पाहिजेत अशी आमची आग्रही मागणी आहे असं उदय सामंत यांनी सांगितले.

तर शिवसेना केंद्र सरकारविरोधात आंदोलन करतेय म्हणून आपणही आंदोलन करतोय हे दाखवण्यासाठी वीजबिलाविरोधात ते आंदोलन करत असतील, पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायेत त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा आंदोलन करतंय असा टोला मंत्री उदय सामंत यांनी भाजपाला लगावला आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे