शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

“विधानसभा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”; शिवसेना मंत्र्याचं विधान

By प्रविण मरगळे | Updated: February 5, 2021 09:32 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले इच्छुक होते, दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेतली

ठळक मुद्देकाँग्रेसकडून अध्यक्षपद घेऊन त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेविधानसभा अध्यक्षपद आता रिक्त असल्याने ते खुलं झालं आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विधानसभा अध्यक्षपदासाठी दावा केलाआगामी काळात विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई – काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नेत्यांची लॉबी सुरू झाली असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिला. पटोलेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यातच शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे आघाडीतला अविश्वास वाढवण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले इच्छुक होते, दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेतली, त्यानंतर गुरूवारी त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. काँग्रेसकडून अध्यक्षपद घेऊन त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, परंतु विधानसभा अध्यक्षपद आता रिक्त असल्याने ते खुलं झालं आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विधानसभा अध्यक्षपदासाठी दावा केला आहे.

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज? 

यातच शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी राज्यात मंत्री कोण होईल, विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवतील, शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे असं विधान करून काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

‘सत्तेचा फॉर्म्युला तयार, फक्त बटण दाबायची देरी' बंद दाराआड नेमकी चर्चा काय घडली?

भाजपावर केली टीका  

काही वर्षापूर्वी केंद्र सरकारने अच्छे दिन आयेंगे म्हणत आम्ही पेट्रोलचे दर कमी करू, डिझेलचे दर कमी करू, गॅस सिलेंडर दर कमी करू असं म्हणत सत्ता आणली, गेल्या ७ वर्षापासून भाजपा सत्तेवर आली, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणं म्हणजे त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होतो, त्यामुळे शिवसेनेकडून इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. हे दर कायमस्वरुपी कमी असले पाहिजेत अशी आमची आग्रही मागणी आहे असं उदय सामंत यांनी सांगितले.

तर शिवसेना केंद्र सरकारविरोधात आंदोलन करतेय म्हणून आपणही आंदोलन करतोय हे दाखवण्यासाठी वीजबिलाविरोधात ते आंदोलन करत असतील, पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायेत त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा आंदोलन करतंय असा टोला मंत्री उदय सामंत यांनी भाजपाला लगावला आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे