शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपाला दोन मुख्य प्रश्न; चीन संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 09:42 IST

Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री पदावरुनही उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटाचिनी कंपनीसोबत केलेल्या कंत्राटावरुन भाजपानं राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतंभाजपाच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पलटवार

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकारण ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. या भाजपा नेत्यांच्या टीकेलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जशास तसे उत्तर दिले आहे. त्याचसोबत चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं आहे.

या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे. तसेच काही जणांकडून सध्या चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुन महाराष्ट्राने चिनी कंपनीसोबत करार केल्याचा आरोप केला. त्यावर आता तुम्हाला चीन नको आहे पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला आणि विरोधकांना विचारला आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

तर मुख्यमंत्री पदावरुनही भाजपाला चिमटा काढला आहे. वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी या’साठी’च केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध झाला असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनासाठी ही मुलाखत घेतली आहे. येत्या २५ आणि २६ जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यात शिवसेना राज्यभरात वाढवण्याचं स्वप्न कायम आहे या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. तसेच मी आजदेखील माझी सही आपला नम्र म्हणूनच करतो असं सांगत त्यांनी आपल्या स्वभावात मुख्यमंत्री झाल्यानंतरही कुठेही बदल झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाindia china faceoffभारत-चीन तणाव