शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपाला दोन मुख्य प्रश्न; चीन संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 09:42 IST

Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री पदावरुनही उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटाचिनी कंपनीसोबत केलेल्या कंत्राटावरुन भाजपानं राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतंभाजपाच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पलटवार

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकारण ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. या भाजपा नेत्यांच्या टीकेलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जशास तसे उत्तर दिले आहे. त्याचसोबत चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं आहे.

या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे. तसेच काही जणांकडून सध्या चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुन महाराष्ट्राने चिनी कंपनीसोबत करार केल्याचा आरोप केला. त्यावर आता तुम्हाला चीन नको आहे पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला आणि विरोधकांना विचारला आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

तर मुख्यमंत्री पदावरुनही भाजपाला चिमटा काढला आहे. वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी या’साठी’च केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध झाला असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनासाठी ही मुलाखत घेतली आहे. येत्या २५ आणि २६ जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यात शिवसेना राज्यभरात वाढवण्याचं स्वप्न कायम आहे या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. तसेच मी आजदेखील माझी सही आपला नम्र म्हणूनच करतो असं सांगत त्यांनी आपल्या स्वभावात मुख्यमंत्री झाल्यानंतरही कुठेही बदल झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाindia china faceoffभारत-चीन तणाव