शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपाला दोन मुख्य प्रश्न; चीन संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 09:42 IST

Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री पदावरुनही उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटाचिनी कंपनीसोबत केलेल्या कंत्राटावरुन भाजपानं राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतंभाजपाच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पलटवार

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकारण ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. या भाजपा नेत्यांच्या टीकेलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जशास तसे उत्तर दिले आहे. त्याचसोबत चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं आहे.

या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे. तसेच काही जणांकडून सध्या चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुन महाराष्ट्राने चिनी कंपनीसोबत करार केल्याचा आरोप केला. त्यावर आता तुम्हाला चीन नको आहे पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला आणि विरोधकांना विचारला आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

तर मुख्यमंत्री पदावरुनही भाजपाला चिमटा काढला आहे. वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी या’साठी’च केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध झाला असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनासाठी ही मुलाखत घेतली आहे. येत्या २५ आणि २६ जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यात शिवसेना राज्यभरात वाढवण्याचं स्वप्न कायम आहे या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. तसेच मी आजदेखील माझी सही आपला नम्र म्हणूनच करतो असं सांगत त्यांनी आपल्या स्वभावात मुख्यमंत्री झाल्यानंतरही कुठेही बदल झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाindia china faceoffभारत-चीन तणाव