शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांवर भरवसा; शिवसेनेत पुन्हा एकदा दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 09:46 IST

क्राईम पत्रकार म्हणून संजय राऊतांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर सामनाची जबाबदारी दिली.

ठळक मुद्देदेशपातळीपासून राज्यातील कोणत्याही प्रश्नावर संजय राऊत यांनी नेहमी पक्षाची बाजू ठामपणे मांडलीराज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा संजय राऊत यांचाचअनेकदा संजय राऊत यांनी आक्रमक शैलीतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई -  सध्या राजकीय पटलावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विरोधकांना सळो की पळो सोडणाऱ्या संजय राऊतांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला भरवसा असल्याचं पुन्हा दाखवून दिले आहे. कंगना प्रकरणावरुन संजय राऊत यांनी आक्रमक शैली सगळ्यांनीची पाहिली आहे. संजय राऊतांवर चहुबाजूने टीका होत असताना शिवसेनेने संजय राऊतांना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे.

शिवसेनेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. यात संजय राऊत यांनी मुख्य प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत १० प्रवक्त्यांची नेमणूकही उद्धव ठाकरेंनी केली आहे. यामध्ये खासदार अरविंद सावंत, कोल्हापूरातील खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार नीलम गोऱ्हे, मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

विरोधकांवर बरसणारे संजय राऊत

क्राईम पत्रकार म्हणून संजय राऊतांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर सामनाची जबाबदारी दिली. याच काळात शिवसेनेकडून संजय राऊत यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. मातोश्रीच्या अगदी जवळ असणाऱ्या नेत्यांपैकी संजय राऊत यांचा समावेश आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेला सामना आणि त्यातील अग्रलेख याद्वारे अनेकदा संजय राऊत यांनी आक्रमक शैलीतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

देशपातळीपासून राज्यातील कोणत्याही प्रश्नावर संजय राऊत यांनी नेहमी पक्षाची बाजू ठामपणे आणि आक्रमकपणे मांडली आहे. इतकचं नाही तर अलीकडे राज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा संजय राऊत यांचाच आहे. संजय राऊत यांच्यामुळे इतिहासात कधीही न घडलेलं समीकरण राज्यात साकारलं गेले. भाजपावर जहरी टीकास्त्र, खुमासदार शैलीत फटकारे यामुळे संजय राऊत नेहमी विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं.

गेल्या महिनाभरापासून संजय राऊत पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात शिवसेनेवर होणारी टीका रोखण्यासाठी संजय राऊत पुढे सरसावले आहेत. कंगना राणौत प्रकरणी संजय राऊत यांनी थेट त्यांच्या शैलीतून कंगनाला फटकारलं आहे. कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाने राजकीय वातावरण पेटलं आहे. त्यामुळे शिवसेनेने राऊतांची मुख्य प्रवक्तेपदी नेमणूक केल्याने आगामी काळात ते विरोधकांवर पुन्हा बरसणार आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाKangana Ranautकंगना राणौत