शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांवर भरवसा; शिवसेनेत पुन्हा एकदा दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 09:46 IST

क्राईम पत्रकार म्हणून संजय राऊतांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर सामनाची जबाबदारी दिली.

ठळक मुद्देदेशपातळीपासून राज्यातील कोणत्याही प्रश्नावर संजय राऊत यांनी नेहमी पक्षाची बाजू ठामपणे मांडलीराज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा संजय राऊत यांचाचअनेकदा संजय राऊत यांनी आक्रमक शैलीतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई -  सध्या राजकीय पटलावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विरोधकांना सळो की पळो सोडणाऱ्या संजय राऊतांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला भरवसा असल्याचं पुन्हा दाखवून दिले आहे. कंगना प्रकरणावरुन संजय राऊत यांनी आक्रमक शैली सगळ्यांनीची पाहिली आहे. संजय राऊतांवर चहुबाजूने टीका होत असताना शिवसेनेने संजय राऊतांना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे.

शिवसेनेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. यात संजय राऊत यांनी मुख्य प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत १० प्रवक्त्यांची नेमणूकही उद्धव ठाकरेंनी केली आहे. यामध्ये खासदार अरविंद सावंत, कोल्हापूरातील खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार नीलम गोऱ्हे, मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

विरोधकांवर बरसणारे संजय राऊत

क्राईम पत्रकार म्हणून संजय राऊतांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर सामनाची जबाबदारी दिली. याच काळात शिवसेनेकडून संजय राऊत यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. मातोश्रीच्या अगदी जवळ असणाऱ्या नेत्यांपैकी संजय राऊत यांचा समावेश आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेला सामना आणि त्यातील अग्रलेख याद्वारे अनेकदा संजय राऊत यांनी आक्रमक शैलीतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

देशपातळीपासून राज्यातील कोणत्याही प्रश्नावर संजय राऊत यांनी नेहमी पक्षाची बाजू ठामपणे आणि आक्रमकपणे मांडली आहे. इतकचं नाही तर अलीकडे राज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा संजय राऊत यांचाच आहे. संजय राऊत यांच्यामुळे इतिहासात कधीही न घडलेलं समीकरण राज्यात साकारलं गेले. भाजपावर जहरी टीकास्त्र, खुमासदार शैलीत फटकारे यामुळे संजय राऊत नेहमी विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं.

गेल्या महिनाभरापासून संजय राऊत पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात शिवसेनेवर होणारी टीका रोखण्यासाठी संजय राऊत पुढे सरसावले आहेत. कंगना राणौत प्रकरणी संजय राऊत यांनी थेट त्यांच्या शैलीतून कंगनाला फटकारलं आहे. कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाने राजकीय वातावरण पेटलं आहे. त्यामुळे शिवसेनेने राऊतांची मुख्य प्रवक्तेपदी नेमणूक केल्याने आगामी काळात ते विरोधकांवर पुन्हा बरसणार आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाKangana Ranautकंगना राणौत