शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सिद्धूंना झुकते माप मिळत असल्याने कॅप्टन संतप्त, सोनिया गांधींना लिहिले खरमरीत पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 23:03 IST

Amrinder Singh: नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नवी दिल्ली - पंजाबमध्येकाँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. उलट दिवसागणिक दोन्ही गटांमधील मतभेदांची दरी अधिकच रुंदावताना दिसत आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना एक खरमरीत पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जर सिद्धू यांना पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले तर पक्षाचे कशाप्रकारे नुकसान होऊ शकते हे अमरिंदर सिंग यांनी या पत्रात मांडले. (Captain Amrinder Singh is angry as Sidhu is getting bent measure, wrote a letter to Sonia Gandhi)

सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, सिद्धू यांच्या कार्यपद्धतीमुळे काँग्रेसला नुकसान होईल. तसेच त्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडेल. यादरम्यान आता नाराज झालेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांची समजूत घालण्यासाठी हरिश रावत हे उद्या चंदिगड येथे जाणार आहेत. दरम्यान, उद्या दुपारी ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चा करून हायकमांडची भूमिका त्यांच्यासमोर मांडतील.नवज्योत सिंग सिद्धू यांना अध्यक्ष बनवण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागल्यापासू कॅप्टन अमरिंदर सिंग हे नाराज आहेत. मात्र सोनिया गांधींसोबत सिद्धूच्या बैठकीनंतर पक्षाने पंजाबसाठीचा निर्णय सध्या पुढे ढकलला आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि हरिश रावत यांच्याशी चर्चा केली होती. तसेच या पेचप्रसंगाबाबत सोनिया गांधी लवकरच निर्णय घेतील, असा दावाही काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होता.  गेल्या एका आठवडाभरापासून काँग्रेसच्या हायकमांड पंजाबमधील वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यश येताना दिसत नाही आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याच्या चर्चांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कमालीचे नाराज केले आहे. सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांनी चंदिगडमध्ये शक्तिप्रदर्शनही केले आहे. त्यातच आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याने हा वाद एवढ्या लवकर संपणार नाही,अशी चिन्हे दिसू लागली आहेत.  

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPoliticsराजकारणPunjabपंजाब