शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सिद्धूंना झुकते माप मिळत असल्याने कॅप्टन संतप्त, सोनिया गांधींना लिहिले खरमरीत पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 23:03 IST

Amrinder Singh: नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नवी दिल्ली - पंजाबमध्येकाँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. उलट दिवसागणिक दोन्ही गटांमधील मतभेदांची दरी अधिकच रुंदावताना दिसत आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना एक खरमरीत पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जर सिद्धू यांना पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले तर पक्षाचे कशाप्रकारे नुकसान होऊ शकते हे अमरिंदर सिंग यांनी या पत्रात मांडले. (Captain Amrinder Singh is angry as Sidhu is getting bent measure, wrote a letter to Sonia Gandhi)

सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, सिद्धू यांच्या कार्यपद्धतीमुळे काँग्रेसला नुकसान होईल. तसेच त्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडेल. यादरम्यान आता नाराज झालेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांची समजूत घालण्यासाठी हरिश रावत हे उद्या चंदिगड येथे जाणार आहेत. दरम्यान, उद्या दुपारी ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चा करून हायकमांडची भूमिका त्यांच्यासमोर मांडतील.नवज्योत सिंग सिद्धू यांना अध्यक्ष बनवण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागल्यापासू कॅप्टन अमरिंदर सिंग हे नाराज आहेत. मात्र सोनिया गांधींसोबत सिद्धूच्या बैठकीनंतर पक्षाने पंजाबसाठीचा निर्णय सध्या पुढे ढकलला आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि हरिश रावत यांच्याशी चर्चा केली होती. तसेच या पेचप्रसंगाबाबत सोनिया गांधी लवकरच निर्णय घेतील, असा दावाही काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होता.  गेल्या एका आठवडाभरापासून काँग्रेसच्या हायकमांड पंजाबमधील वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यश येताना दिसत नाही आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याच्या चर्चांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कमालीचे नाराज केले आहे. सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांनी चंदिगडमध्ये शक्तिप्रदर्शनही केले आहे. त्यातच आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याने हा वाद एवढ्या लवकर संपणार नाही,अशी चिन्हे दिसू लागली आहेत.  

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPoliticsराजकारणPunjabपंजाब