शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

Cabinet Reshuffle: नारायण राणेंना संधी; सिंधुदुर्ग पुन्हा केंद्रीय सत्तास्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 19:54 IST

प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभू यांच्यानंतर सिंधुदुर्गातील तिसरे केंद्रीय मंत्री

- महेश सरनाईक  सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप निर्माण करणाऱ्या सिंधुदुर्ग सुपुत्र माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांची बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने कोकणात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते, खासदार सुरेश प्रभू यांच्यानंतर नारायण राणे हे सिंधुदुर्गातील तिसरे केंद्रीय मंत्री झाले आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि विशेषत: कोकणावर आपली राजकीय पकड कायम ठेवण्यात राणे गेली ४० वर्षे यशस्वी ठरले आहेत. त्याचा फायदा साहजिकच कोकणच्या विकासाला झाला आहे. आता राणे केंद्रीय मंत्री झाल्याने त्याचा फायदा कोकण आणि विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे.राणे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेमधून झाली असून १९९९ साली त्यांनी मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. ते दक्षिण कोकणातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्याचप्रमाणे युती सरकारमध्ये दुग्धविकास मंत्री, महसूलमंत्री ही पदे त्यांनी भूषविली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदावर सलग सहा वर्षे राहण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.शिवसेनेला रामराम करून काँग्रेसमध्ये दाखल झाल्यावर ९ वर्षे ते राज्याच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री आणि उद्योगमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. त्यानंतर २०१४ साली त्यांचा पहिल्यांदा विधानसभेत पराभव झाला होता. त्यानंतर वांद्रे पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. २०१६ मध्ये ते काँग्रेसमधून विधान परिषद सदस्यदेखील झाले होते. मात्र, २०१९ मध्ये राणे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना राज्यसभेवर खासदार केले.नारायण राणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अफाट ताकदीचे, डॅशिंग अष्टपैलू नेतृत्व आहे. राजकारणातून समाजकारण करण्याची वृत्ती कोकणला दाखविणारे नारायण राणे यांचे व्यक्तीमत्त्व अनेकांसमोर आदर्श आहे.तळकोकणातील पहिलेच मुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे समितीचे सदस्य म्हणून नारायण राणे यांनी १९९१ ते ९३ या काळात काम पाहिले. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेची सत्ता असताना मार्च १९९५ पासून जानेवारी १९९९ पर्यंत कॅबिनेट मंत्री म्हणून आठ खात्यांचा यशस्वी पदभार स्वीकारला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिले आणि राणे कामाला लागले. त्यांच्या रूपाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला म्हणजेच तळकोकणाला प्रथमच मुख्यमंत्रिपदाचा सन्मान मिळाला होता.अभेद्य राजकीय कारकिर्द४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कणखर विरोधी पक्षनेते अशी भूमिका बजावताना अभेद्य सह्याद्रीएवढीच राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ठरली आहे. कोकण सुपुत्राची महाराष्ट्राच्या राजकारणात तळपत राहिलेली तलवार कोकण विकासाचा मानबिंदू ठरली. शिवसेना ते काँग्रेस आणि आता भाजपा अशा राजकीय प्रवासातही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची छाप अखंड राहिली आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस