शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

बुलडाण्यात आघाडी अन् युतीचे त्रांगडे, १५ वर्षांपासून सेनेचा झंझावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 05:48 IST

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

- नीलेश जोशीबुलडाणा- कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राखीव असलेला बुलडाणा मतदारसंघ खुला झाल्यानंतर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. मात्र दोन्ही वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला. सध्यातरी आघाडी आणि युतीच्या जागा वाटपाचे त्रांगडे निर्माण झाले असून हा गुुंता सुटल्यावरच लढतीचे संभाव्य चित्र स्पष्ट होणार आहे.शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी सर्कल मेळाव्याच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला आहे. तर परिवर्तनाची हाक देत राष्ट्रवादीनेही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. सेना आणि राष्टÑवादी असा सामना पुन्हा होण्याची चिन्हे आहेत. गेल्या दहा वर्षापासून प्रतापराव जाधव येथे खासदार आहेत. युती झाली तर तेच उमेदवार असतील; मात्र युती झाली नाही तर त्यांना काँग्रेस आघाडीसह, भाजपासोबत लढत द्यावी लागणार आहे. युती न झाल्यास भाजपाकडून जळगाव जामोदचे आ. डॉ. संजय कुटे किंवा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांना उमेदवारी मिळू शकते. मात्र जिल्ह्याची राजकीय स्थिती पाहता भाजपाशी युतीशिवाय सेनेला ही जागा जिंकता येणे कठीण आहे. खा. जाधव यांच्या विरोधात जाणारा ‘अ‍ॅन्टी इनकम्बन्सी’ फॅक्टर राष्टÑवादीच्या पथ्थ्यावर पडणारा आहे. त्यामुळेच खुद्द शरद पवार यांनी या जागेचा हट्ट धरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा सांगितला आहे. काँग्रेसला जागा मिळाली, तर आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. राहुल बोंद्रे हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार असतील. आ.हर्षवर्धन सपकाळ विरोधातील एक गट त्यांना उमेदवारी मिळू नये, म्हणून प्रयत्नशील आहे. त्यामुळे काँग्रेसला जागा मिळाली तर गटबाजीचा फटका बसू शकतो.राष्ट्रवादी काँग्रेसकडे डॉ. राजेंद्र शिंगणेंच्या रूपाने उमेदवार असला तरी जिल्ह्यात काँग्रेसचे नेटवर्क मोठे आहे. त्यामुळे काँग्रेसला विश्वासात घेऊच राष्टÑवादीला लढाईत उतरावे लागणार आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी बुलडाण्याची जागा प्रतिष्ठेची केली आहे. प्रसंगी ही जागा मिळाली नाही तर आघाडीबाबत विचार करावा लागले, अशी भूमिकाच खा. राजू शेट्टी यांनी घेतलेली आहे. त्यामुळे महाआघाडीतील जागा वाटपाचा गुंता सुटल्याशिवाय या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार नाही. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने या जागेसाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आ. बळीराम शिरस्कार यांचे नाव जाहीर केले आहे. लहान-मोठ्या सर्वच पक्षांचा या मतदारसंघावर डोळा असला तरी, जोपर्यंत युती आणि आघाडीचे नक्की ठरत नाही, तोपर्यंत खरे चित्र स्पष्ट होणार नाही.>सध्याची परिस्थितीकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊन हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर डॉ. राजेंद्र शिंगणे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचा निकटवर्तीयांचा दावा आहे. डॉ.शिंगणे यांना यापूर्वी खा.जाधव यांच्याशी लढताना पराभवाचा सामना करावा लागला होतो. त्यामुळे शिंगणे यांनी सध्या जनसंपर्क वाढविला आहे. काँग्रेसला मतदारसंघ सुटावा यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आग्रही असून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील जनाधार हा काँग्रेसच्या पारड्यात आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या चर्चेच्या अंतिम फेरीत याबाबत काय निर्णय होतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.शिवसेनेतील अंतर्गत वाद अन् विद्यमान खासदारांबाबत असलेला अ‍ॅन्टी इनकम्बन्सी फॅक्टर सेनेला यावेळी अडचणीत ठरणार असल्याची चर्चा आहे. युती झाली नाही तर भाजपा स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करीत आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही महाआघाडीत या जागेवर दावा कायम ठेवला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९