शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
2
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
3
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
4
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
5
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
6
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
7
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
8
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
9
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
10
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
11
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
12
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
13
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
14
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
15
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
16
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
17
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
18
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
19
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
20
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?

अ‍ॅडव्हाटेंज अजित पवार; निर्णय मोदी सरकारचा, पण फायदा ठाकरे सरकारला

By कुणाल गवाणकर | Updated: February 2, 2021 13:18 IST

अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेचा ठाकरे सरकारला लाभ मिळणार

ठळक मुद्देसीतारामन यांच्या घोषणेचा फायदा होणारकेरळ, राजस्थान सरकारनं केली होती मागणीराज्य सरकारांना घेता येणार अधिकचं कर्ज

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, नोकरदार आणि महिलांसाठी कोणत्याही मोठ्या घोषणा, तरतुदी नसल्यानं काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. मात्र आरोग्य सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे राज्यांना एक मोठा फायदा होणार आहे. सीतारामन यांनी केलेल्या घोषणेमुळे राज्यांना वित्तीय स्वातंत्र्य मिळालं आहे. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी दिली मोजकीच प्रतिक्रिया; म्हणाले...देशातील राज्य सरकारं आता त्यांच्या जीडीपीच्या ४ टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातून राज्यांना हा अधिकार देण्यात आला आहे. आधी यासाठीची सीमा ३ टक्के इतकी होती. केरळ, राजस्थान यांच्यासारखी भाजपची सत्ता नसलेली राज्यं यासाठी आग्रही होती. अखेर मोदी सरकारनं या राज्यांची मागणी पूर्ण केली आहे. यामुळे सध्याच्या घडीला महसूलाची तूट सहन कराव्या लागणाऱ्या राज्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं याबद्दलचा निर्णय घेतला आहे."उद्धव ठाकरे यांनी हातात कागद न घेता अर्थसंकल्पावर 30 मिनिटं बोललं पाहिजे"ठाकरे सरकारला होणार फायदादेशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचं योगदान अतिशय जास्त आहे. मात्र कोरोनामुळे राज्याच्या महसूलावर, जीडीपीवर परिणाम झाला. कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्याला बसला. एका बाजूला उद्योगधंदे बंद असल्यानं महसूल आटला असताना दुसऱ्या बाजूला वैद्यकीय सुविधांवर होणारा खर्च वाढला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला. मात्र आता केंद्रानं राज्यांना वाढीव कर्ज घेण्यास मंजुरी दिल्यानं राज्याला फायदा होईल. ही बाब अर्थमंत्री अजित पवार यांना अर्थसंकल्प सादर करताना फायदेशीर ठरेल.काय म्हणाल्या अर्थमंत्री सीतारामन?१५ व्या वित्तीय आयोगाच्या शिफारशीनुसार आम्ही राज्य सरकारं घेऊ शकत असलेल्या कर्जाची सीमा वाढवत आहोत. आता राज्य सरकारनं त्यांच्या जीडीपीच्या ४ टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतात, असं सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ही सीमा निश्चित करण्यात आली आहे. या कर्जाचा एक हिस्सा पूल, रस्ते. विमानतळं यासारख्या मोठ्या प्रकल्पांवर खर्च केला जाईल.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे