शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या निकालानंतर भाजपाचं ‘मिशन मुंबई महापालिका’; शिवसेनेसाठी ठरणार धोक्याची घंटा?

By प्रविण मरगळे | Updated: November 11, 2020 17:11 IST

BIhar Election Result, BMC, BJP & Shiv Sena News: भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक बनण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमुंबई महापालिका निवडणुकीत बिहार निवडणुकीसारखे परिणाम पाहायला मिळतील.शिवसेनेचं हे काँग्रेस प्रेम बिहारी जनतेला रुचलं नाही. मतदानाच्या माध्यमातून बिहारी जनतेने उत्तर दिलंकाँग्रेसला बिहारमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाला पहिल्यांदाच राज्यात ७४ जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडी सुरु झाली आहे. यातच बिहारमधील यशाचा पॅटर्न आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्याची तयारी भाजपाने केली आहे.

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक बनण्याची शक्यता आहे. शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत बिहार निवडणुकीसारखे परिणाम पाहायला मिळतील. शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, शिवसेनेचं हे काँग्रेस प्रेम बिहारी जनतेला रुचलं नाही. मतदानाच्या माध्यमातून बिहारी जनतेने उत्तर दिलं आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली ते जनतेला आवडलं नाही. त्यामुळेच काँग्रेसला बिहारमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं, याप्रकारेच मुंबई महापालिकेत लोक शिवसेनेची साथ सोडतील असा दावा शेलारांनी केला आहे.

तसेच मुंबई महापालिका निवडणूक भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात लढवली जाईल. मुख्यमंत्रिपदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी जी कामं केली त्याच्या आधारे आम्ही जनतेला मतदान मागणार आहोत. महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, या निवडणुकीवर देवेंद्र फडणवीसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र अद्याप आशिष शेलारांनी मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती सांगण्यास नकार दिला. परंतु मुंबई महापालिकेत यंदा परिवर्तन नक्कीच दिसणार असा विश्वास भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे बिहार पॅटर्न?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बिहार पॅटर्न अंमलात आणण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस रणनीती आखत आहेत. या निवडणुकीत अशी रणनीती बनवणार असून त्यात बूथस्तरावरील भाजपा कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. विकासाचे मुद्दे, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि ठाकरे सरकारचं अपयश यावर जनतेकडे मतदान मागितलं जाणार आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे वगळता अन्य कोणत्याही नेत्याचा थेट मतदारांशी संपर्क नाही. भाजपा असे बरेच नेते आहेत ज्यांचा मतदारांशी संपर्क आहे असंही भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस