शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

बिहारच्या निकालानंतर भाजपाचं ‘मिशन मुंबई महापालिका’; शिवसेनेसाठी ठरणार धोक्याची घंटा?

By प्रविण मरगळे | Updated: November 11, 2020 17:11 IST

BIhar Election Result, BMC, BJP & Shiv Sena News: भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक बनण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमुंबई महापालिका निवडणुकीत बिहार निवडणुकीसारखे परिणाम पाहायला मिळतील.शिवसेनेचं हे काँग्रेस प्रेम बिहारी जनतेला रुचलं नाही. मतदानाच्या माध्यमातून बिहारी जनतेने उत्तर दिलंकाँग्रेसला बिहारमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाला पहिल्यांदाच राज्यात ७४ जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडी सुरु झाली आहे. यातच बिहारमधील यशाचा पॅटर्न आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्याची तयारी भाजपाने केली आहे.

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक बनण्याची शक्यता आहे. शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत बिहार निवडणुकीसारखे परिणाम पाहायला मिळतील. शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, शिवसेनेचं हे काँग्रेस प्रेम बिहारी जनतेला रुचलं नाही. मतदानाच्या माध्यमातून बिहारी जनतेने उत्तर दिलं आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली ते जनतेला आवडलं नाही. त्यामुळेच काँग्रेसला बिहारमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं, याप्रकारेच मुंबई महापालिकेत लोक शिवसेनेची साथ सोडतील असा दावा शेलारांनी केला आहे.

तसेच मुंबई महापालिका निवडणूक भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात लढवली जाईल. मुख्यमंत्रिपदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी जी कामं केली त्याच्या आधारे आम्ही जनतेला मतदान मागणार आहोत. महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, या निवडणुकीवर देवेंद्र फडणवीसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र अद्याप आशिष शेलारांनी मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती सांगण्यास नकार दिला. परंतु मुंबई महापालिकेत यंदा परिवर्तन नक्कीच दिसणार असा विश्वास भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे बिहार पॅटर्न?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बिहार पॅटर्न अंमलात आणण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस रणनीती आखत आहेत. या निवडणुकीत अशी रणनीती बनवणार असून त्यात बूथस्तरावरील भाजपा कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. विकासाचे मुद्दे, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि ठाकरे सरकारचं अपयश यावर जनतेकडे मतदान मागितलं जाणार आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे वगळता अन्य कोणत्याही नेत्याचा थेट मतदारांशी संपर्क नाही. भाजपा असे बरेच नेते आहेत ज्यांचा मतदारांशी संपर्क आहे असंही भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस