शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बिहारच्या निकालानंतर भाजपाचं ‘मिशन मुंबई महापालिका’; शिवसेनेसाठी ठरणार धोक्याची घंटा?

By प्रविण मरगळे | Updated: November 11, 2020 17:11 IST

BIhar Election Result, BMC, BJP & Shiv Sena News: भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक बनण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमुंबई महापालिका निवडणुकीत बिहार निवडणुकीसारखे परिणाम पाहायला मिळतील.शिवसेनेचं हे काँग्रेस प्रेम बिहारी जनतेला रुचलं नाही. मतदानाच्या माध्यमातून बिहारी जनतेने उत्तर दिलंकाँग्रेसला बिहारमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाला पहिल्यांदाच राज्यात ७४ जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडी सुरु झाली आहे. यातच बिहारमधील यशाचा पॅटर्न आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्याची तयारी भाजपाने केली आहे.

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक बनण्याची शक्यता आहे. शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत बिहार निवडणुकीसारखे परिणाम पाहायला मिळतील. शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, शिवसेनेचं हे काँग्रेस प्रेम बिहारी जनतेला रुचलं नाही. मतदानाच्या माध्यमातून बिहारी जनतेने उत्तर दिलं आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली ते जनतेला आवडलं नाही. त्यामुळेच काँग्रेसला बिहारमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं, याप्रकारेच मुंबई महापालिकेत लोक शिवसेनेची साथ सोडतील असा दावा शेलारांनी केला आहे.

तसेच मुंबई महापालिका निवडणूक भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात लढवली जाईल. मुख्यमंत्रिपदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी जी कामं केली त्याच्या आधारे आम्ही जनतेला मतदान मागणार आहोत. महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, या निवडणुकीवर देवेंद्र फडणवीसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र अद्याप आशिष शेलारांनी मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती सांगण्यास नकार दिला. परंतु मुंबई महापालिकेत यंदा परिवर्तन नक्कीच दिसणार असा विश्वास भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे बिहार पॅटर्न?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बिहार पॅटर्न अंमलात आणण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस रणनीती आखत आहेत. या निवडणुकीत अशी रणनीती बनवणार असून त्यात बूथस्तरावरील भाजपा कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. विकासाचे मुद्दे, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि ठाकरे सरकारचं अपयश यावर जनतेकडे मतदान मागितलं जाणार आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे वगळता अन्य कोणत्याही नेत्याचा थेट मतदारांशी संपर्क नाही. भाजपा असे बरेच नेते आहेत ज्यांचा मतदारांशी संपर्क आहे असंही भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस