शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल; स्मृती इराणी म्हणाल्या, "कृतघ्न..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 08:35 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी हे कृतघ्न असल्याचं म्हणत स्मृती इराणी यांनी साधला जोरदार निशाणा

ठळक मुद्देराहुल गांधी हे कृतघ्न असल्याचं म्हणत स्मृती इराणी यांनी साधला जोरदार निशाणाकाँग्रेसचं राजकारण विभाजन करणारं असल्याचं योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केरळमध्ये राहुल गांधी यांच्याद्वारे नाव न घेता अमेठीवर केलेल्या एका वक्तव्यावरून स्मृती इराणी यांनी निशाणा साधला. "१५ वर्षांपर्यंत मी उत्तर भारतात खासदार होतो. मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळमध्ये येणं नवं होतं. कारण मला वाटलं इथल्या लोकांना मुद्द्यांमध्ये आवड असते आणि ते मुद्द्यांच्या विस्तारात जाणारे आहेत," असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर स्मृती इराणी यांनी जोरदार निशाणा साधला. स्मृती इराणी यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ते कृतघ्न असल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला. "सनातन आस्थेच्या केरळपासून प्रभू श्रीराम यांचं जन्मस्थळ असलेल्या उत्तर प्रदेशपर्यंत सर्व लोकांनी तुम्हाला ओळखलं आहे. तोडण्याचं राजकारण हे तुमचे संस्कार आहे. आम्ही उत्तर किंवा दक्षिण नाही संपूर्ण देशाला मातेसमान मानतो," असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.  तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली. "राहुल गांधी यांनी पहिले उत्तर भारताला काँग्रेसमुक्त केलं. आता दक्षिणेकडे गेले आहेत. आमच्यासाठी आणि जनतेसाठी देश एक आहे. काँग्रेस भारताला उत्तर आणि दक्षिण अशा भागात विभागू पाहत आहे. जनता या प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीyogi adityanathयोगी आदित्यनाथshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcongressकाँग्रेसBJPभाजपाKeralaकेरळUttar Pradeshउत्तर प्रदेश