शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

BJP Maharashtra : मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं...?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 15:19 IST

BJP slams CM Uddhav Thackeray over thinking of lockdown : कोरोनाच्या Corona वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत.

ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत.आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया, असा सल्ला महिंद्रा यांनी दिला होता.

वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळे काहीशी चिंता आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. यासंदर्भात महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी राज्यातील ठाकरे सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया, असा महत्त्वाचा सल्ला महिंद्रा यांनी दिला होता. यानंतर भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  BJP slams CM Uddhav Thackeray over thinking of lockdown 'उद्धव ठाकरे तुमच्या नाकर्तेपणामुळे सामान्य जनतेला बळीचा बकरा ठरवू नका...! मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं? तुमचे निर्बंध, नियमांमध्ये पोळणाऱ्या जनतेला विचारा लॉकडाऊनमध्ये जगता येईल काय...? कधी हे जाणून घेतलंत का, मुख्यमंत्रीसाहेब...?' असं म्हणत भाजपनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. भाजपनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरू आनंद महिंद्रा यांच्या सल्ल्याचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. 'लॉकडाऊनच्या पांघरूणाखाली अपयश लपवू नका ठाकरे सरकार, राज्यात कोणाचंही भविष्य उद्ध्वस्त करू नका. तुमच्या नाकर्तेपणानं कोणालाही बळी पडू देऊ नका,' असंही भाजपनं म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते आनंद महिंद्रा?"उद्धवजी, समस्या अशी आहे की लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालये / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होते. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया," असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी  ट्विट करत  ठाकरे सरकारला दिला आहे.लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला  आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाAnand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्राFacebookफेसबुक