शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
2
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
3
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
4
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
5
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
6
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
7
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
8
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
9
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
10
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
11
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
12
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
13
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
14
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
15
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
17
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
18
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
19
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
20
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका

’भाजपाने बिहारच्या विजयाचा आनंद पुढची चार वर्षे साजरा करावा’ शिवसेनेचा सामनामधून टोला

By बाळकृष्ण परब | Updated: November 18, 2020 08:02 IST

Shiv Sena News : बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजपा नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल. सोबतच महाराष्ट्रातही शांतता राहील

ठळक मुद्देनितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक, पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल का हा प्रश्नच आहेमहाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहेआजपासून वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात पचका झाला व ते दु:ख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारमध्ये असतात

मुंबई - बिहार विधानसभा निवडणूक आणि नितीश कुमार यांच्या शपथविधीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखातून भाजपाला जोरदार टोले लगावले आहेत. नितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक, पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल का हा प्रश्नच आहे. बिहारमध्ये ज्यांनी चमकदार कामगिरी केली ते तेजस्वी यादव हे विरोधी पक्षात बसले आहेत. महाराष्ट्रातही सगळ्यात मोठा पक्ष हा विरोधात बसला आहे. त्याचेच प्रतिबिंब बिहारमध्ये पडले आहे. पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपाने पुढची चार वर्षे साजरा करत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजपा नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल. सोबतच महाराष्ट्रातही शांतता राहील, असा टोला सामनामधून लगावण्यात आला.बिहारमध्ये दिल्या घेतल्या शब्दास जागून भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद बहाल केले. या मेहेरबानीच्या ओझ्याखाली पुढचे दिवस ढकलावे लागतील. या चिंतेने नितीश कुमारांच्या चेहऱ्यावरचे तेज उडाले आहे. नितीश कुमार सलग सातवेळा अशाच तडजोडी करून मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, भाजपातर्फे देवेंद्र फडणवीस यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी शब्द दिला होता, असे सांगितले. मात्र महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिला नव्हता असे फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दु:ख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारमध्ये असतात, असा चिमटाही सामनामधून काढण्यात आला आहे.बिहारमधील सरकार संपूर्ण पाच वर्षे चालेल असा आत्मविश्वास भाजपा नेत्यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून, ते फार काळ चालणार नाही, अशी खदखद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या ढोंगास काय म्हणावे. बिहारमधील भाजपा-जेडीयू सरकारचे बहुमत हे केवळ २-३ आमदारांचे आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तीसेक आमदारांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार पडण्याची भाषा करणे म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे आहे. देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते. फडणवीस यांना बिहार सरकारकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले हे ठीक, पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल का हा प्रश्नच आहे, असा चिमटाही सामनामधून काढण्यात आला आहे.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitish Kumarनितीश कुमार