शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

“संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय”; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 14:27 IST

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत यांच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तरसंजय राऊत यांना याबाबत पूर्ण माहिती नसावी; भाजपचा टोलायासंदर्भात औरंगाबाद खंडपीठासमोर सरकारचे प्रतिज्ञापत्र सादर-भाजप

नवी दिल्ली: दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांमध्ये सलग दोन दिवस विरोधकांनी मोठा गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही सभागृहांची कार्यवाही अनेकदा स्थगितही करण्यात आली. यातच आता ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याचे केंद्र सरकारच्या वतीने संसदेत सांगितले गेले. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली असून, शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय, असा टोलाही भाजपने लगावला आहे. (bjp sambit patra replied sanjay raut criticism over oxygen shortage death figures)

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही, असे लेखी उत्तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संसदेत दिले. यावरून केंद्रीय मंत्र्यांचे ते वक्तव्य ऐकून मी अवाक झालोय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात शेकडो हजारोंचा जीव गेला. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांना केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य ऐकून काय वाटेल ? केंद्र सरकार खोटं बोलत आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 

“जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात”; भाजप नेत्याचा मोदींना टोला

संजय राऊत यांची माहिती अपुरी

संजय राऊतांना कदाचित पूर्ण माहिती नाही. संजय राऊत म्हणत होते की आम्हाला धक्का बसला. अशा मृत्यूंमुळे धक्का बसलाच पाहिजे. पण खोट्या बाबींवर तुम्ही राजकारण करत असाल, तर आम्हाला धक्का बसला आहे. तुम्ही अशा विषयांवर राजकारण करत आहात, या शब्दांत संबित पात्रा यांनी पलटवार केला. तसेच महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाही, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्याच नातेवाईकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली होती. यावर राज्य सरकारने उत्तर दिले आहे, असेही पात्रा यांनी नमूद केले. 

दरम्यान, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ऑक्सिजन तुटवडा झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाला फोन केल्याचे सांगितले होते. त्यानंतर तातडीने ऑक्सिजन पुरवठा झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारवर आरोप करणे चुकीचे ठरेल. राज्यांकडून कदाचित चूक होऊ शकते, असेही ते म्हणाले होते, याची आठवण पात्रा यांनी यावेळी करून दिली. यावेळी संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस खासदार, नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. 

टॅग्स :PoliticsराजकारणOxygen Cylinderऑक्सिजनBJPभाजपाSambit Patraसंबित पात्राSanjay Rautसंजय राऊतCentral Governmentकेंद्र सरकारDr Bharti Pawarडॉ. भारती पवार