शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 22:33 IST

भाजपने शिर्डी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्यात आले. ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक टोला लगावला आहे.

ठळक मुद्देनीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा राजीनामा द्यावापोलिसांची मदत घेऊन सरकारचा राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्नभाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली टीका

शिर्डी: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन, निषेध, निदर्शने केली. याशिवाय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही मोठ्या प्रमाणात झडल्या. यातच भाजपने शिर्डी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्यात आले. ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक टोला लगावला आहे. (bjp radhakrishna vikhe patil criticized thackeray govt over narayan rane arrest) 

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिर्डीच्या प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्यातील महाविकासआघाडी सरकार पोलिसांच्या मदतीने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला. 

मोदी सरकारकडून आता कोकण रेल्वेचे खासगीकरण? ७२८१ कोटींचा निधी उभारणार

तर मग आरत्या ओवाळायच्या का?

पोलिसांची मदत घेऊन महाविकास आघाडी सरकारने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना आहे. असे यापूर्वी कधीही घडले नाही. लोकशाहीत मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे, अशी टीका करत इथे लोकांचे बळी जात आहेत, पण सरकार कामच ‌करत नाही. असे असेल तर मग तुमच्या आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक सवाल विखे पाटील यांनी केला आहे. 

नीलम गोऱ्हेंनी राजीनामा द्यावा

जेव्हा जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटत असेल तर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? महाडच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकार तोंडावर पडलेय, असा टोला लगावत नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा राजीनामा द्यावा. हे पद घटनात्मक पद आहे. ते कोणत्या पक्षाचे नसते. असे असतानाही त्या राजकीय भूमिका मांडतात, बोलतात. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय! रोजगाराला चालना मिळणार; १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी

दरम्यान, नारायण राणे यांचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या‌ जिव्हारी लागले. खरे तर मुख्यमंत्र्यांनी अगोदर माफी मागावी. देशाचा अमृत महोत्सव की हीरक महोत्सव हे त्यांना समजत नसेल, तर हा देशवासीयांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना