शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Video - "तो 'केम छो वरळी' विचारणारा आमदार कुठे आहे?"; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 3:43 PM

BJP Nilesh Rane Slams Shivsena Aditya Thackrey Over Tauktae Cyclone in Mumbai Worli : भाजपा नेते निलेश राणे यांनी मुंबईतील पावसाचा एक व्हिडीओ शेअर करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) जबरदस्त तडाखा सोमवारी कोकणासह मुंबई, ठाणे आणि पालघरला बसला. ताशी ८० ते १२० किमी वेगाने वाहणारा धडकी भरवणारा सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे हजारांवर झाडे भुईसपाट झाली, तर चार हजारांवर घरांचे नुकसान झाले. सोमवारी जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांना अक्षरश: धडकी भरली. सखल भागात पाणी साचल्याने आणि मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक मंदावली. रेल्वे ट्रॅकवरदेखील झाडे पडल्याच्या घटना घडल्याने लोकल वाहतुकही काही काळ खंडित झाली. यानंतर आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

भाजपा नेते निलेश राणे (BJP Nilesh Rane) यांनी मुंबईतील पावसाचा एक व्हिडीओ शेअर करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Shivsena Aditya Thackrey) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. वरळी (Worli) हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ. तौत्के चक्रीवादळानंतरचा वरळीमध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा एक व्हिडीओ निलेश राणेंनी ट्वीट केला असून आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. "तो केम छो वरळी विचारणारा आमदार कुठे आहे???" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. तसेच सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही असं देखील म्हटलं आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडीओ ट्विट करून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. 

"हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे... वरळीकर विचारतायत तो 'केम छो वरळी' विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही" असं म्हणत निलेश राणे यांनी पावसामुळे वरळीमध्ये झालेल्या परिस्थितीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नागरिक गुडघाभर पाण्यामधून जात असलेले पाहायला मिळत आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं देखील दिसत आहे. यामुळेच निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. 

तौत्के चक्रीवादळाचा मुंबई तसेच सागरीकिनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील प्रभाव ओसरला असला तरी मदतकार्य वेगाने सुरू ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रशासनाला दिले. कोविड रुग्णालयांना वीजपुरवठा खंडित होऊ दिला नाही. पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात चार, रत्नागिरी, ठाणे  प्रत्येकी दोन, सिंधुदुर्ग आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एक मीरा रोड येथे १ अशा एकूण ११ जणांचा बळी गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.

तौत्केचा तडाखा! मुंबई, कोकणात मोठे नुकसान

कोकणात रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या प्रभावामुळे पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा येथे सहा घरांची पडझड झाली. वादळाबाबत माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच राज्यात येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती आधीच अडचणीची आहे. कोकणातील वादळग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची भूमिका राज्य शासनाला घ्यावी लागणार आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने राज्याला मदतीचे पॅकेज द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडून केंद्राकडे केली जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळMumbaiमुंबईNilesh Raneनिलेश राणे Aditya Thackreyआदित्य ठाकरेworli-acवरळीRainपाऊसPoliticsराजकारण