शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

"शरद पवार सांभाळताहेत निष्क्रिय मुख्यमंत्र्यांची मर्जी, पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून महाविकास आघाडी सरकार...’’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 12:43 PM

Maharashtra Politics: या पूरस्थितीमध्ये सापडलेल्या लोकांच्या मदतीच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपिचंद पडळकर (Gopochand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि या सरकारचे निर्माते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - गेल्या आठवड्यात कोकणातील चिपळूण, महाडसह इतर भागात आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेला महापूर तसेच विविध ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटना यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. मात्र या पूरस्थितीमध्ये सापडलेल्या लोकांच्या मदतीच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपिचंद पडळकर (Gopochand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि या सरकारचे निर्माते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील बहुतांश भागात पूरस्थिती असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून राज्यातील सरकार खुर्ची बचाव कार्यक्रमात व्यस्त आहे, असा टोला गोपिचंद पडळकर यांनी लगावला आहे. (Gopochand Padalkar Says,"Sharad Pawar is managing the will of the inactive Chief Minister, leaving the flood victims in the air and the government is busy in the  government rescue program"

गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यातील पूरग्रस्त जनतेला सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना हे सरकार खुर्ची बचाव कार्यक्रमात व्यस्त आहे. तसेच या महाविकास आघाडी सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार हे निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. तसेच दौरे केले म्हणून आपल्याच पुतण्याला खडसावत आहेत, असा टोला पडळकर यांनी लगावला.

राज्यात कारखानदारांच्या भ्रष्टाचारामुळे बंद पडलेल्या, मोडकळीस आलेल्या कारखान्यांना वाचवण्यासाठी तिजोरीमधून ३८०० कोटींची तरतूद करण्यास हे सरकार मागेपुढे पाहत नाही. मात्र, पुराने उद्ध्वस्त झालेल्या कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागांसाठी या सरकारला तिजोरी उघडता येत नाही. त्यांच्याकडे हे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. मागे पूर आला होता. तेव्हा फडणवीस सरकारने तातडीने मदत केली होती, आता आलेल्या पुरामुळे आधीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता तातडीने प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात यावी. तसेच व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षांसाठी घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजबील माफ करण्यात यावे, अशी मागणी पडळकर यांनी केली. 

दरम्यान, पूर ओसरल्यानंतर या भागांमध्ये नेतेमंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नेतेमंडळींच्या दौऱ्यांमुळे प्रशासनावरील ताण वाढतो. त्यामुळे नेतेमंडळींनी अशा भागातील दौरे टाळावेत, असा सल्ला दिला होता. त्यावरूनही गोपिचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. दौरे केले म्हणून शरद पवार आपल्याच पुतण्याची कानउघाडणी करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण