शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

“मनसेची भूमिका योग्य, शिवसेनेला टोला”; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By प्रविण मरगळे | Updated: February 22, 2021 14:25 IST

BJP Gopichand Padalkar Target CM Uddhav Thackeray & Shiv Sena: शिमग्याला चुकल्याप्रमाणे हे ठाकरे सरकार बोंब मारतं, केंद्र सरकारने लॉकडाऊनकाळात अनेकांना मदत केली परंतु राज्य सरकारने एकतरी योजना दाखवावी ज्याच्यामुळे जनतेला मदत मिळाली असेल असं आव्हान पडळकरांनी राज्य सरकारला केले.

ठळक मुद्देलॉकडाऊन करणार असं म्हणता त्याआधी गोरगरिबांची व्यवस्था करा, तुम्ही लॉकडाऊन करणार आणि घरात बसणारराज्यातील जनतेचे प्रश्न मांडणे आणि सोडवून घेणे ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहेसामना किती लोक वाचतात हे माहिती नाही, आमच्या जिल्ह्यात सामना पेपर येत नाही, मी कधी ते वृत्तपत्र वाचलं नाही

सिंधुदुर्ग – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना वाढलाय असं सांगून राज्याचं अधिवेशन टाळत असाल तर राज्यातील जनता पाहत आहे, ती तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.(BJP Gopichand Padalkar Criticized Thackeray Government over Corona increase in Maharashtra)

आमदार गोपीचंद पडळकर(BJP MLA Gopichand Padalkar) म्हणाले की, ठाकरे सरकारला कुठल्याचं परिस्थितीचं गांभीर्य नाही, कोरोना काळात लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर लॉकडाऊन उघडल्यानंतरही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला १०० हून अधिक पत्र पाठवलं, त्यात कोरोना चाचणी थांबवू नको, जास्तीत वाढवा असं म्हटलं होत, तेव्हा सरकारने कानडोळा केला, विरोधी पक्षनेत्यांचे ऐकलं नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच १ मार्चला अधिवेशन आहे म्हटल्यावर पुन्हा संचारबंदी, कोरोना, कलम १४४, लॉकडाऊन करणार असे प्रयोग सुरू झालेत, लॉकडाऊन करणार असं म्हणता त्याआधी गोरगरिबांची व्यवस्था करा, तुम्ही लॉकडाऊन करणार आणि घरात बसणार, पण महाराष्ट्रातले सगळे खेड्यापाड्यातील गरीब जनता आहे, त्यांची चुल पेटणार कशी? या लोकांना उत्पन्नाचा दुसरा सोर्स नाही, काम केल्यावरच त्यांचे पोट भरतं, शिमग्याला चुकल्याप्रमाणे हे ठाकरे सरकार बोंब मारतं, केंद्र सरकारने लॉकडाऊनकाळात अनेकांना मदत केली परंतु राज्य सरकारने एकतरी योजना दाखवावी ज्याच्यामुळे जनतेला मदत मिळाली असेल असं आव्हान पडळकरांनी राज्य सरकारला केले.

मनसेची भूमिका योग्य  

अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना वाढलंय असं दाखवलं जात आहे असा आरोप मनसेने राज्य सरकारवर केला होता, त्यावर पडळकरांनी मनसेची(MNS) भूमिका योग्य असल्याचं म्हणत वाढीव वीजबिलाने राज्यातील जनता त्रस्त आहे, सरकारला जनतेशी काही देणंघेणं नाही, मनसेने मांडलेली भूमिका योग्यच आहे. अधिवेशन पूर्णवेळ झालं पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे, राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणे आणि सोडवून घेणे ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, पण अधिवेशन २ दिवस घेणार असाल आणि कोरोना झाला म्हणून अधिवेशन टाळणार असाल हे जनता पाहत आहे. यापुढे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत असं त्यांनी म्हटलं.

सामना आमच्या जिल्ह्यात कोणी वाचत नाही

सामना किती लोक वाचतात हे माहिती नाही, आमच्या जिल्ह्यात सामना पेपर येत नाही, मी कधी ते वृत्तपत्र वाचलं नाही, तुम्ही टीव्हीवर दाखवता तेव्हा सामना दैनिक अस्तित्वात आहे हे लोकांना कळतं अन्यथा सामना कोणी वाचतही नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेचे फार दखल घ्यायचं कारण नाही अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेला(Shivsena) टोला लगावला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरMNSमनसेShiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस