शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

'पूरग्रस्तांना दिलेलं पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी; मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 3:38 PM

Ashish Shelar on government: 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळून पूरग्रस्तांना योग्य ती मदत करावी.'

ठळक मुद्दे'एकीकडे सर्व सामान्यांना प्रवास द्यायचा नाही, दुसरीकडे शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने भरणार'

धुळे:भाजपा आमदार आशिष शेलार सध्या तीन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी धुळे येथे संघटनात्मक बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकार परिषदेत आघाडी सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलेले पॅकेज हे वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची बातमी असल्याचे म्हटले. तसेच, उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्तांना मदत करू असे सांगितले होतं, पण त्यांनी पॅकेज घोषित केल्याने मुख्यमंऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला आहे, असा घणाघातही केला. 

राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत दिलेली शिथिलता आहे की जनतेची छळवणूक आहे, हे नागरिकांना कळत नाही आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांनाही कळत नाही. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवास दिला जात नाही, याबाबत उच्च न्यायालयाने देखील सवाल विचारला आहे. एकीकडे सर्व सामान्यांना प्रवास द्यायचा नाही, दुसरीकडे शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने भरणार. ही शासनाची दुट्टपी भूमिका असल्याची टीका शेलार यांनी केली.

राज्य सरकार भ्रष्टाचारांचयावेळी शेलारांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. राज्याचे सरकार हे लुटो, बाटो आणि खाओ असे हे तिघाडी सरकार आहे. सरकारमध्ये पोलिसांच्या बदल्यामध्ये दलाली सुरू आहे, त्यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण झालाय. राज्यातील अनेक अधिकारी केंद्राच्या सेवेत सामिल झालेत, त्यामुळे राज्याची व्यवस्था कोलमडली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं नसून भ्रष्टाचाऱ्यांचं असल्याची टीकाही शेलारांनी केलीय. 

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Shelarआशीष शेलारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा