शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

दिग्विजय सिंह म्हणाले - गोडसे देशातील पहिला दहशतवादी; भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 16:40 IST

नाथूराम गोडसे (Nathuram Godse) भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देत प्रज्ञा सिंहांनी दिग्विजय यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.

भोपाळ : भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांवर (Digvijaya Singh) निशाणा साधला आहे. नाथूराम गोडसे (Nathuram Godse) भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देत प्रज्ञा सिंहांनी दिग्विजय यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. काँग्रेस आणि त्यांचे नेते नेहमीच देशभक्तांना शिव्या देतात, असे प्रज्ञा सिंहांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर 'भगवा आतंकवाद' सारखा शब्दही काँग्रेसनेच आणला, आता यावरूनच त्यांचे विचार काय असतील, हे समजते, असेही प्रज्ञा सिंह म्हणाल्या.

काँग्रेसने केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकले आहे -प्रज्ञा सिंह ठाकून या भोपाळमधून भाजपच्या खासदार आहेत. दिग्विजय सिंह यांच्या नाथूराम गोडसेसंदर्भातील वक्तव्यासंदर्भात त्यांना विचारले असता, आपल्या अंदाजातच त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या, ‘काँग्रेसने केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकले आहे.  त्यांच्या नेत्यांनी ‘भगवा आतंकवाद’ सारख्या शब्दांचा वापर केला आहे. याहून अधिकि शरमेची गोष्ट काय असू शकते.’ 

प्रज्ञा सिंह म्हणाल्या होत्या नथुराम देशभक्त -तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. यावरून प्रज्ञा सिंह या वादाच्या भोवऱ्यातही अडकल्या होत्या. याच मुद्द्यावर देशाचे राजकारणही तापले होते. यानंतर भाजपला स्पष्टिकरणही द्यावे लागले होते. मात्र, असे असतानाही प्रज्ञा सिंह या भोपाळमधून मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या.

प्रशासनाने बंद केली गोडसे ज्ञानशाळा - ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतल्यानंतर हिंदू महासभेने नाथूराम गोडसेंची ज्ञानशाळा मंगळवारी बंद केली. 10 जानेवारीला हिंदू महासभेने दौलतगंज येथील आपल्या कार्यालयात ही ज्ञानशाळा सुरू केली होती. तसेच यावेळी गोडसेची पुजाही करण्यात आली होती. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तसेच शिवराज सरकारलाही घेरले जात होते. यानंतर प्रशासनाने महासभेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ही ज्ञानशाळा बंद करण्यात आली. तसेच संबंधित भागात कलम 144 लावण्यात आले.

टॅग्स :Nathuram Godseनथुराम गोडसेBJPभाजपाDigvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश