शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

डॉक्टर साहेब प्रामाणिकच होते, त्यांच्या हाताखालच्यांनी प्रत्येक विभागात घोटाळे केले : अनुराग ठाकुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 16:49 IST

Anurag Thakur in Rajya Sabha : मोदी सरकार हे देशाला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल, अनुराग ठाकुर यांचा विश्वास

ठळक मुद्देमोदी सरकार हे देशआला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल, अनुराग ठाकुर यांचा विश्वासमोदी सरकारच्या काळात कोणताही घोटाळा नाही, याला प्रमाणिक सरकार म्हणतात : अनुराग ठाकुर

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी शुक्रवारी राज्य सभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. एअर इंडियाची परिस्थिती कोणामुळे खालावली आणि देशातील ६ विमानतळांच्या खासगीकरणाची सुरूवात कोणी केली होती? असा सवाल ठाकुर यांनी सार्वजनिक संपत्ती विकण्याच्या आरोपावरून केले. यावेळी अनुराग ठाकुर यांनी युपीए सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा मुद्दादेखील उपस्थित केला. "डॉक्टरसाहेब (माजी पंतप्रधान मनमोहन सिंग) प्रामाणिकच व्यक्ती होते. परंतु त्यांच्या खाली काम करत असलेल्यानी कदाचितच असा कोणता विभाग सोडला ज्यात घोटाळा झआला नाही. आज सात वर्षांच्या मोदी सरकारच्या कालावधीत सात पैशांचाही घोटाळा झाला नाही. हे प्रामाणिक सरकार असतं," असं ठाकुर म्हणाले. "आज व्याजदर कमी होत आहेत अनेक सुविधा मिळत आहेत. यामुळे सामान्य व्यक्तींना गरीबांना घरं मिळत आहेत. मोदी सरकार हे देशाला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल," असा विश्वासही ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केला. आज स्मार्टफोन्सचा सर्वात मोठा उत्पादक गेश म्हणून भारत पुढे आला आहे. देशात सात मोठे टेक्सटाईल पार्क उभारले जाणार आहे. हा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी देशातील अनेक तज्ज्ञांशी चर्चा आणि सल्ले घेण्यात आले. यापूर्वी देशात पीपीई किट तयार होत नव्हते. परंतु आज ते आपण अन्य देशांना देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी अनुराग ठाकुर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी सरकारच्या काही धोरणांमुळे बंगालच्या लाखो शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेता आला नाही. ज्यांची नजरच काळी आहे त्यांना सर्वच काळं दिसत असल्याचं म्हणत ठाकुर यांनी नव्या कृषी कायद्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंगMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल