शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

"उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत, ते तर..."

By कुणाल गवाणकर | Updated: November 25, 2020 15:37 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठीच जन्माला आलेले आहेत. पक्ष चालवणं आणि प्रशासन चालवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामावर टीका केली.“उद्या उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ अन् जयंत पाटलांचा ‘जपा’ असा उल्लेख व्हायला लागला तर...”जे खेचून नेतो, तो नेता, अशी नेत्याची सर्वसाधारण व्याख्या आहे. पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी वीज बिल वाढीच्या विषयाचा संदर्भ दिला. 'वीज बिलात सवलत देण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भूमिका होती. त्यांनी त्यासाठीची फाईल अर्थमंत्री अजित पवारांकडे पाठवली. निधी नसल्याचं म्हणत अजित पवारांनी ती फाईल मागे पाठवली. या ठिकाणी नेता म्हणून उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप करायला हवा होता. जनतेला दिलासा देणं आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे ५०० कोटी कमी करा. ते इथे वळवा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं,' असं पाटील म्हणाले.माझं नाव घेतल्याशिवाय मंत्री मुश्रीफ व जयंत पाटील यांना झोप येत नाही - चंद्रकांत पाटीलमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. 'एखाद्या विषयाची माहिती घेण्याची, मंत्रिमंडळाला घेऊन एका दिशेनं जाण्याची गरज त्यांना वाटत नाही. कारण ते प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठी जन्माला आलेले आहेत. पक्ष चालवलं आणि प्रशासनाचा गाडा हाकणं हे पूर्णत: वेगळे विषय आहेत. प्रशासन चालवताना तुम्हाला प्रचंड वेळ द्यावा लागतो. अनेक जुने संदर्भ घ्यावे लागतात. सर्वोच्च न्यायालयाच्या १०० निर्णयांचा अभ्यास करावा लागतो किंवा त्याबद्दलची माहिती संबंधितांकडून घ्यावी लागते,' असं पाटील यांनी सांगितलं.शरद पवारांबद्दल बोलताना जपून बोला; चंद्रकांतदादांच्या विधानावर फडणवीसांची भूमिकाप्रशासनाचा अनुभव आणि मनाची तयारी नसताना उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झाले, असंही ते पुढे म्हणाले. 'बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष संघटनेकडे लक्ष दिलं. ते लोकांच्या समस्या ऐकायचे आणि संबंधितांशी संपर्क साधून त्यांना मदत करायला सांगायचे. त्यांनी लोकांना वेळ दिला. उद्धव ठाकरेंनी तोच वारसा चालवला. कोणत्याही प्रभागातून निवडून येऊ शकत असतानाही ते कधी नगरसेवक झाले नाहीत. आमदार, खासदार झाले नाहीत. प्रशासकीय अनुभव नसताना ते थेट मुख्यमंत्री झाले,' असं पाटील म्हणाले. माझं उद्धव ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नाही. उलट मैत्रीच आहे. मध्यंतरी विश्वासघात झाल्यानं फक्त आता भेटीगाठी कमी होतात, असं त्यांनी पुढे सांगितलं.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारNitin Rautनितीन राऊतBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना