शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

"उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत, ते तर..."

By कुणाल गवाणकर | Updated: November 25, 2020 15:37 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठीच जन्माला आलेले आहेत. पक्ष चालवणं आणि प्रशासन चालवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामावर टीका केली.“उद्या उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ अन् जयंत पाटलांचा ‘जपा’ असा उल्लेख व्हायला लागला तर...”जे खेचून नेतो, तो नेता, अशी नेत्याची सर्वसाधारण व्याख्या आहे. पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी वीज बिल वाढीच्या विषयाचा संदर्भ दिला. 'वीज बिलात सवलत देण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भूमिका होती. त्यांनी त्यासाठीची फाईल अर्थमंत्री अजित पवारांकडे पाठवली. निधी नसल्याचं म्हणत अजित पवारांनी ती फाईल मागे पाठवली. या ठिकाणी नेता म्हणून उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप करायला हवा होता. जनतेला दिलासा देणं आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे ५०० कोटी कमी करा. ते इथे वळवा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं,' असं पाटील म्हणाले.माझं नाव घेतल्याशिवाय मंत्री मुश्रीफ व जयंत पाटील यांना झोप येत नाही - चंद्रकांत पाटीलमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. 'एखाद्या विषयाची माहिती घेण्याची, मंत्रिमंडळाला घेऊन एका दिशेनं जाण्याची गरज त्यांना वाटत नाही. कारण ते प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठी जन्माला आलेले आहेत. पक्ष चालवलं आणि प्रशासनाचा गाडा हाकणं हे पूर्णत: वेगळे विषय आहेत. प्रशासन चालवताना तुम्हाला प्रचंड वेळ द्यावा लागतो. अनेक जुने संदर्भ घ्यावे लागतात. सर्वोच्च न्यायालयाच्या १०० निर्णयांचा अभ्यास करावा लागतो किंवा त्याबद्दलची माहिती संबंधितांकडून घ्यावी लागते,' असं पाटील यांनी सांगितलं.शरद पवारांबद्दल बोलताना जपून बोला; चंद्रकांतदादांच्या विधानावर फडणवीसांची भूमिकाप्रशासनाचा अनुभव आणि मनाची तयारी नसताना उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झाले, असंही ते पुढे म्हणाले. 'बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष संघटनेकडे लक्ष दिलं. ते लोकांच्या समस्या ऐकायचे आणि संबंधितांशी संपर्क साधून त्यांना मदत करायला सांगायचे. त्यांनी लोकांना वेळ दिला. उद्धव ठाकरेंनी तोच वारसा चालवला. कोणत्याही प्रभागातून निवडून येऊ शकत असतानाही ते कधी नगरसेवक झाले नाहीत. आमदार, खासदार झाले नाहीत. प्रशासकीय अनुभव नसताना ते थेट मुख्यमंत्री झाले,' असं पाटील म्हणाले. माझं उद्धव ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नाही. उलट मैत्रीच आहे. मध्यंतरी विश्वासघात झाल्यानं फक्त आता भेटीगाठी कमी होतात, असं त्यांनी पुढे सांगितलं.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारNitin Rautनितीन राऊतBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना