शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

BJP Foundation Day: ४१ वर्षाच्या राजकीय प्रवासात भाजपानं कोणाची साथ घेतली अन् कोणाला डच्चू दिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 09:51 IST

भाजपाच्या ४१ वर्षाच्या कारकिर्दीत शून्यापासून शिखरापर्यंत पोहचण्यामागे वैचारिक विरोधक लेफ्टसारख्या पक्षांसोबत हातमिळवणीचा प्रयोग असेल

ठळक मुद्देस्वातंत्र्यानंतर दक्षिणपंथी राजकारणामुळे श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. परंतु काँग्रेसच्या लोकप्रियतेपुढे ते यशस्वी होऊ शकले नाही.इंदिरा गांधी यांच्याविरोधात राजकीय प्रयोग अयशस्वी राहिल्यानंतर १९७९ मध्ये जनता पार्टीत चरण चौधरींनी समर्थकांसह बंडखोरी केली. ६ एप्रिल १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावानं राजकीय पक्षाची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले आणि १९८४ मध्ये निवडणुकीत भाजपाला केवळ २ जागा मिळाल्या होत्या.

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी सध्याच्या राजकीय इतिहासात सर्वात यशस्वी आणि सक्षम पक्ष बनला आहे. जिथे केंद्राच्या सत्तेपासून देशातील अर्ध्या राज्यात भाजपाचं सरकार आहे. मात्र या यशामागं अनेक वर्षाचा संघर्ष आहे. स्वातंत्र्यानंतर काही वर्षात १९५१ मध्ये जनसंघाचा पाया रोवला गेला आणि आणीबाणीच्या काळात जनता पार्टीत त्याचं रुपांतर झालं. पुढे जाऊन ६ एप्रिल १९८० मध्ये भारतीय जनता पार्टी स्थापन झाली.

भाजपाच्या ४१ वर्षाच्या कारकिर्दीत शून्यापासून शिखरापर्यंत पोहचण्यामागे वैचारिक विरोधक लेफ्टसारख्या पक्षांसोबत हातमिळवणीचा प्रयोग असेल, काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी जनता दलाची साथ आणि जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनवण्यासाठी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्ससारख्या पक्षांना सोबत घेण्यातही भाजपा मागे राहिली नाही. भाजपाने राजकीय शिखर गाठण्यासाठी कोणत्या पक्षाची साथ घेतली आणि सत्तेसाठी कोणाचं समर्थन घेतलं हे जाणून घेऊया

डाव्या पक्षांसोबत पहिला राजकीय प्रयोग

स्वातंत्र्यानंतर दक्षिणपंथी राजकारणामुळे श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. परंतु काँग्रेसच्या लोकप्रियतेपुढे ते यशस्वी होऊ शकले नाही. १९७५ मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली. तेव्हा जनसंघ त्याच्याविरोधात मैदानात उतरला. जनसंघाच्या अनेक नेत्यांना जेलमध्ये जावं लागलं. १९७७ मध्ये आणीबाणी संपल्यानंतर देशात निवडणुका झाल्या. तेव्हा जनसंघाचं जनता पार्टीत रुपांतर झालं. ज्यात सोशलिस्ट, काँग्रेस बंडखोर, डाव्यांचा एक गट जनता पार्टीसोबत उभा राहिला तर दुसरा गट काँग्रेससोबत.

इंदिरा गांधी यांच्याविरोधात राजकीय प्रयोग अयशस्वी राहिल्यानंतर १९७९ मध्ये जनता पार्टीत चरण चौधरींनी समर्थकांसह बंडखोरी केली. त्यामुळे मोरारजी देसाईच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं. काँग्रेसच्या समर्थनाने चौधरी चरण सिंह पंतप्रधान बनले. त्यानंतर जनसंघातून आलेल्या नेत्यांनी जनता पार्टीपासून स्वत:ला वेगळं केले. ६ एप्रिल १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावानं राजकीय पक्षाची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले आणि १९८४ मध्ये निवडणुकीत भाजपाला केवळ २ जागा मिळाल्या होत्या.

१९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर देशात आघाडीचं राजकारण सुरू झालं. काँग्रेसला रोखण्यासाठी पहिल्यांदा डावे, भाजपा आणि जनता दल एकत्र आले. तत्कालीन राजीव गांधी सरकार बोफोर्स घोटाळा, एलटीटीई आणि श्रीलंका सरकारच्या अंतर्गत युद्धापर्यंत अनेक मुद्द्यावर अडकलं होतं. काँग्रेससोडून जनता दल स्थापन करणारे वीपी सिंह विरोधकांचा मुख्य चेहरा बनले. १९८९ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला. काँग्रेसने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. जनता दल आणि इतर स्थानिक राजकीय पक्षांनी मिळून नॅशनल फ्रंट बनवत सरकारची स्थापना केली. पहिल्यांदाच काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी विविध विचारांचे पक्ष एकत्र आले. वीपी सिंह पंतप्रधान बनले. १९९१ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिरासाठी रथयात्रा काढली तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये त्यांना अटक केली. त्यामुळे भाजपाने जनता दल सरकारचं समर्थन काढून घेतलं. तेव्हा ११ महिन्यांनी वीपी सिंह सरकार विश्वासदर्शक ठराव हरली आणि सरकार कोसळलं.

१९९८ मध्ये भाजपाने युतीचं राजकारण सुरू केले. यात स्थानिक प्रादेशिक पक्षांसोबत मिळून भाजपानं NDA ची स्थापना केली. यात पंजाबमध्ये अकाली दल, बिहारमध्ये समता पार्टी तर महाराष्ट्रात शिवसेना आधीपासून भाजपाच्या सोबत होती. दक्षिण भारतात तेलगु देशम पार्टीला सोबत घेतलं तर ओडिशामध्ये बीजू जनता NDA त सामील झाली. उत्तर प्रदेशात कांशीरामच्या बसपाला समर्थन देत मायावती सरकार बनवलं होतं.

भाजपाच्या नेतृत्वात NDA ला १९९८ लोकसभा निवडणुकीत यश मिळालं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात सरकार बनलं मात्र हे सरकार १३ महिन्यांहून अधिक काळ चाललं नाही. त्यानंतर भाजपाने १९९९ मध्ये सहकारी पक्षांसोबत मिळून निवडणूक लढवली आणि सलग ५ वर्ष सरकार चालवलं. अटलबिहारी वाजपेयी बिगर काँग्रेसी पहिले पंतप्रधान होते ज्यांनी ५ वर्ष पूर्ण केली होती.

टॅग्स :BJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीcongressकाँग्रेस