शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

Devendra Fadnavis: “भगव्याची शपथ घेणारे लोक आता...”; देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 22:04 IST

ते सावरकारांचा अपमान करतात त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं.

पुणे – आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा महापालिकेवर फडकवायचा आहे. मला अलीकडच्या काळात भाजपाच्या भगव्याचा विशेष उल्लेख करावा लागतो. कारण भगव्याची शपथ घेणारे अशा लोकांसोबत आहेत ज्यांना भगव्याचा मान नाही, सन्मान नाही, ज्यांना स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास लाज वाटते अशां लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. ते लोक रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात अशी बोचरी टीका भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर केली आहे.

पुण्यात भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्धाटन करण्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या १२ खासदारांचं निलंबन करण्यात आले. त्यात २ शिवसेनेचे खासदार आहेत. तेव्हा संसदेत निलंबित सदस्यांना माफी मागण्यास सांगितले त्यांनी असं विधान केले की, आम्ही माफी मागायला सावरकर आहोत का? भ्रष्टाचाराच्या पैशातून ज्यांचे महाल पोसले गेले. ते सावरकारांचा अपमान करतात त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही सावकरवादी आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. होय आम्हाला गर्व आहे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करतो. भारत चोहीकडे प्रगती करतोय. कोविड काळात मोदींच्या नेतृत्वात भारतीय लस तयार झाल्या नसल्या तर काय अवस्था झाली असती? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.

मोदींच्या नेतृत्वात भारताने लस विकसित केली

अमेरिका, इंग्लंड, रशियासारख्या देशांनी आमचं लसीकरण झाल्याशिवाय तुम्हाला लस मिळणार नाही मग तुम्ही जगला की मेला आम्हाला पर्वा नाही असं भारताला म्हटलं असतं. पण मोदींच्या नेतृत्वात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, वैज्ञानिकांना हिंमत देऊन हवी ती मदत देऊन भारतीय जनतेला मोफत लस उपलब्ध करुन दिली. महाराष्ट्र सरकारने १० कोटी जनतेला लस दिल्या त्या लसी केंद्र सरकारने दिल्या. मोदींच्या नावानं शंख फोडणारे हे लोक जनतेचा विश्वासघात करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम मोदींच्या नेतृत्वात सुरु झाले आहे. २०२२ मध्ये जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची असेल असं अनेक संस्थांनी सांगितले आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भ्रष्टाचारामुळे नोकरशाही संपुष्टात

महाराष्ट्रात वसुलीशिवाय काही सुरु नाही. नोकरशाही संपुष्टात येते. राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराने महाराष्ट्रातील नोकरशाहीला पोखरुन टाकलं. सामान्य माणसांचा विचार करायला कोणी तयार नाही. पुणे महापालिकेला १ पैसा कोविड काळात राज्य सरकारने दिला नाही. कोविड काळात भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून लोकांची मदत करत होते असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा