शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वात मोठा धक्का; अयोध्या आणि वाराणसीत भाजपाला जोरदार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 17:49 IST

Uttar Pradesh Panchayat Election 2021: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील पंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

ठळक मुद्देप्रभू रामाचं भव्य मंदिरात उभं राहणाऱ्या अयोध्या नगरीत भाजपाला अतिशय वाईटरित्या पराभवाचा सामना करावा लागत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात ४० जागांपैकी केवळ ८ जागांवर भाजपाला यश मिळालं आहेपुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या स्थानिक निवडणुकांना मोठं महत्त्व प्राप्त झालं होतं.

लखनौ – उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाजपाची पिछेहाट होताना दिसत आहे. भाजपासाठी सर्वात महत्त्वाचं शहर अयोध्या आणि काशी(वाराणसी)मध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मथुरेत मायावती यांच्या बसपाने भाजपाला धोबीपछाड दिली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील पंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकांमध्ये विधानसभेची चाचणी म्हणून बघितलं जात होतं. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यासाठी निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांचे निकाल पूर्ण होण्यासाठी काही अवधी शिल्लक आहे.

सध्या ५ शहरांमधील निकालाचं चित्र काय आहे?

अयोध्या – प्रभू रामाचं भव्य मंदिरात उभं राहणाऱ्या अयोध्या नगरीत भाजपाला अतिशय वाईटरित्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी जिल्हा पंचायत समितीच्या ४० सदस्यांपैकी २४ जागांवर समाजवादी पक्षाने बाजी मारली आहे. तर भाजपाच्या खात्यात अवघ्या ६ जागा गेल्या आहेत. तर मायावती यांच्या बसपानं ५ जागा जिंकल्या आहेत.

वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात ४० जागांपैकी केवळ ८ जागांवर भाजपाला यश मिळालं आहे. तर १४ जागा जिंकून समाजवादी पक्ष अव्वल ठरला आहे. तसेच अपक्ष १, अपना दल १, बसपा १ आणि अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला १ जागा मिळाली आहे. उर्वरित जागांवर मतमोजणी सुरू आहे.

मथुरा – जिल्हा परिषदेच्या एकूण ३३ जागा आहेत. इथं बसपाने १३ जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर भाजपाच्या खात्यात ८ आणि समाजवादी पक्षाच्या खात्यात १ जागा मिळाली आहे. राष्ट्रीय लोकदलाचे ८ आणि अपक्ष ३ उमेदवार जिंकले आहेत. तर काँग्रेसचा सूपडा साफ झाला आहे.

लखनौ – केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या मतदारसंघात २५ जागांचे निकाल आले आहेत. यात भाजपाला ३, सपा १० आणि बसपा ४ आणि इतरांना ८ जागांवर यश मिळालं आहे.

गोरखपूर – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात ६८ पैकी केवळ २० जागा भाजपाला तर समाजवादी पक्षाला १९ जागांवर यश मिळालं आहे. आतापर्यंत ६५ जिल्हा पंचायत जागांचे निकाल समोर आले आहेत. यात सर्वाधित २१ जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. तर बसपा २, काँग्रेस, आप आणि निषाद पक्ष प्रत्येकी १ जागांवर जिंकला आहे. ३ वार्डाचे निकाल येणे बाकी आहे.  

टॅग्स :ElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ