शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

Bihar: नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्यावर RJD चा बहिष्कार; ‘त्या’ १५ जागांसाठी कोर्टात जाणार

By प्रविण मरगळे | Updated: November 16, 2020 14:22 IST

Bihar Election Result, RJD, CM Nitish Kumar, Congress News: एनडीएच्या फसवणुकीमुळे जनतेत आक्रोश आहे. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि जनतेसोबत कायम राहू असं आरजेडीने सांगितलं आहे.

ठळक मुद्देनितीश कुमार आज संध्याकाळी सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतीलराष्ट्रीय जनता दल शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणारसरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

पटना – बिहार निवडणुकीच्या निकालात जेडीयू आणि भाजपाप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं. जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राजभवनात दुपारी ४.३० वाजता शपथविधी सोहळ्याचं आयोजनाची खास तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र बिहारमधील विरोध पक्ष आरजेडी या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार आहे.

आरजेडी सूत्रांच्या माहितीनुसार बिहारच्या निवडणुकीत जनतेने नितीश कुमार यांच्याविरोधात जनादेश दिला आहे. आरजेडी जनतेसोबत आहे. जनतेच्या आग्रहास्तव तेजस्वी यादव आणि त्यांच्या पक्षातील कोणीही नेता शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नाही. त्याचसोबत तेजस्वी यादव १५ जागांवर कायदेशीर लढाई करणार आहेत, ज्याठिकाणी खूप कमी फरकाने आरजेडीचा पराभव झाला आहे.

आरजेडीने ट्विट करून सांगितले आहे की, राष्ट्रीय जनता दल शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार आहे. निवडणुकीत जनतेने सरकार बदलण्यासाठी मतदान केले होते, जनादेशाला शासनादेशमध्ये बदलण्यात आले. बिहारच्या बेरोजगार, शेतकरी, कर्मचारी आणि शिक्षकांची अवस्था काय झाली, त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं हे विचारावं. एनडीएच्या फसवणुकीमुळे जनतेत आक्रोश आहे. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि जनतेसोबत कायम राहू असं त्यांनी सांगितले आहे.

 

दरम्यान, नितीश कुमार आज संध्याकाळी सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहारचे राज्यपाल फागू चौहान नितीश कुमारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. उपमुख्यमंत्री म्हणून सुशील मोदी यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपाकडून विधीमंडळ गटनेतेपदी किशोर प्रसाद आणि उपनेतेपदी मंजू देवी यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं आहे.

नितीश कुमार यांची कसोटी लागणार

नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

महाआघाडीत वादाची ठिणगी

महाआघाडीसाठी काँग्रेस ही बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती असं आरजेडी नेते शिवानंद तिवारी म्हणाले होते. त्यावर तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे अशी नाराजी काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा यांनी शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली.  

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलTejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेसBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार