शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

Bihar: नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्यावर RJD चा बहिष्कार; ‘त्या’ १५ जागांसाठी कोर्टात जाणार

By प्रविण मरगळे | Updated: November 16, 2020 14:22 IST

Bihar Election Result, RJD, CM Nitish Kumar, Congress News: एनडीएच्या फसवणुकीमुळे जनतेत आक्रोश आहे. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि जनतेसोबत कायम राहू असं आरजेडीने सांगितलं आहे.

ठळक मुद्देनितीश कुमार आज संध्याकाळी सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतीलराष्ट्रीय जनता दल शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणारसरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

पटना – बिहार निवडणुकीच्या निकालात जेडीयू आणि भाजपाप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं. जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राजभवनात दुपारी ४.३० वाजता शपथविधी सोहळ्याचं आयोजनाची खास तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र बिहारमधील विरोध पक्ष आरजेडी या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार आहे.

आरजेडी सूत्रांच्या माहितीनुसार बिहारच्या निवडणुकीत जनतेने नितीश कुमार यांच्याविरोधात जनादेश दिला आहे. आरजेडी जनतेसोबत आहे. जनतेच्या आग्रहास्तव तेजस्वी यादव आणि त्यांच्या पक्षातील कोणीही नेता शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नाही. त्याचसोबत तेजस्वी यादव १५ जागांवर कायदेशीर लढाई करणार आहेत, ज्याठिकाणी खूप कमी फरकाने आरजेडीचा पराभव झाला आहे.

आरजेडीने ट्विट करून सांगितले आहे की, राष्ट्रीय जनता दल शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार आहे. निवडणुकीत जनतेने सरकार बदलण्यासाठी मतदान केले होते, जनादेशाला शासनादेशमध्ये बदलण्यात आले. बिहारच्या बेरोजगार, शेतकरी, कर्मचारी आणि शिक्षकांची अवस्था काय झाली, त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं हे विचारावं. एनडीएच्या फसवणुकीमुळे जनतेत आक्रोश आहे. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि जनतेसोबत कायम राहू असं त्यांनी सांगितले आहे.

 

दरम्यान, नितीश कुमार आज संध्याकाळी सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहारचे राज्यपाल फागू चौहान नितीश कुमारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. उपमुख्यमंत्री म्हणून सुशील मोदी यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपाकडून विधीमंडळ गटनेतेपदी किशोर प्रसाद आणि उपनेतेपदी मंजू देवी यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं आहे.

नितीश कुमार यांची कसोटी लागणार

नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

महाआघाडीत वादाची ठिणगी

महाआघाडीसाठी काँग्रेस ही बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती असं आरजेडी नेते शिवानंद तिवारी म्हणाले होते. त्यावर तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे अशी नाराजी काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा यांनी शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली.  

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलTejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेसBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार