शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

Bihar Assembly Election Result : अमित शहांचा नितीश कुमारांना फोन; दिल्लीचे दूत मुख्यमंत्री निवासस्थानी हजर

By हेमंत बावकर | Updated: November 10, 2020 20:00 IST

Bihar Election Result 2020 : जदयू-भाजपा आणि राजद-काँग्रेसच्या गोटात आताही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास 10 ते 12 जागांवर 500 ते 100 मतांचे अंतर आहे.

पटना : बिहार निवडणुकीची मतमोजणी ऐन रंगात आलेली असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थेट दिल्लीतून गृहमंत्री अमित शहा यांनी फोन केला आहे. याचवेळी भाजपाचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि अमित शहांचे दूत नितीश कुमारांच्या निवासस्थानी पोहोचले असून गुप्त खलबते सुरु झाली आहेत. 

जदयू-भाजपा आणि राजद-काँग्रेसच्या गोटात आताही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास 10 ते 12 जागांवर 500 ते 100 मतांचे अंतर आहे. तर काही जागांवर एकेरी आकड्याचे मताधिक्य आहे. बिहारमध्ये अद्याप सव्वा कोटी मते मोजायची असून एडीएने मिळविलेली आघाडी कमी जास्त होण्याची आशा दोन्ही बाजुच्या नेत्यांना आहे. यामुळे पुढे काय करायचे याबाबतची रणनीती ठरविली जात आहे. 

अमित शहांनी फोन केला तेव्हा भाजपाचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेश अध्यक्ष संजय जयस्वाल, केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्यासह उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी मुख्यमंत्री निवासस्थानी आले होते. या नेत्यांमध्ये निवडणूक निकाल काय येईल, यावर चर्चा झाल्याचे समजते. जदयूच्या वरिष्ठ नेत्यांपैकी दोघांनी अमित शहांनी फोन केल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. परंतू त्यांच्यात काय चर्चा झाली हे सांगण्यास नकार दिला. निवडणूक निकाल आणि सध्याचे ट्रेंड यावर चर्चा झाल्याचे या नेत्यांनी सांगितले. 

निकाल मध्यरात्रीबिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकते अशी स्थिती आहे. याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.

राजदचा भाजपाला धोबीपछाडदरम्यान, राजदने भाजपाचा सर्वात मोठ्या पक्षाचा खिताब काही काळासाठी का होईन काढून घेतला आहे. आजतकने दिलेल्या आकडेवारीनुसार एनडीए 123 तर राजद महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे. तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा 72, राजद 74, जदयू 43, काँग्रेस 20, सीपीआयएल 12 आणि इतर जागांवर अन्य पक्ष आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक