शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Bihar Assembly Election Result : अमित शहांचा नितीश कुमारांना फोन; दिल्लीचे दूत मुख्यमंत्री निवासस्थानी हजर

By हेमंत बावकर | Updated: November 10, 2020 20:00 IST

Bihar Election Result 2020 : जदयू-भाजपा आणि राजद-काँग्रेसच्या गोटात आताही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास 10 ते 12 जागांवर 500 ते 100 मतांचे अंतर आहे.

पटना : बिहार निवडणुकीची मतमोजणी ऐन रंगात आलेली असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थेट दिल्लीतून गृहमंत्री अमित शहा यांनी फोन केला आहे. याचवेळी भाजपाचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि अमित शहांचे दूत नितीश कुमारांच्या निवासस्थानी पोहोचले असून गुप्त खलबते सुरु झाली आहेत. 

जदयू-भाजपा आणि राजद-काँग्रेसच्या गोटात आताही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास 10 ते 12 जागांवर 500 ते 100 मतांचे अंतर आहे. तर काही जागांवर एकेरी आकड्याचे मताधिक्य आहे. बिहारमध्ये अद्याप सव्वा कोटी मते मोजायची असून एडीएने मिळविलेली आघाडी कमी जास्त होण्याची आशा दोन्ही बाजुच्या नेत्यांना आहे. यामुळे पुढे काय करायचे याबाबतची रणनीती ठरविली जात आहे. 

अमित शहांनी फोन केला तेव्हा भाजपाचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेश अध्यक्ष संजय जयस्वाल, केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्यासह उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी मुख्यमंत्री निवासस्थानी आले होते. या नेत्यांमध्ये निवडणूक निकाल काय येईल, यावर चर्चा झाल्याचे समजते. जदयूच्या वरिष्ठ नेत्यांपैकी दोघांनी अमित शहांनी फोन केल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. परंतू त्यांच्यात काय चर्चा झाली हे सांगण्यास नकार दिला. निवडणूक निकाल आणि सध्याचे ट्रेंड यावर चर्चा झाल्याचे या नेत्यांनी सांगितले. 

निकाल मध्यरात्रीबिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकते अशी स्थिती आहे. याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.

राजदचा भाजपाला धोबीपछाडदरम्यान, राजदने भाजपाचा सर्वात मोठ्या पक्षाचा खिताब काही काळासाठी का होईन काढून घेतला आहे. आजतकने दिलेल्या आकडेवारीनुसार एनडीए 123 तर राजद महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे. तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा 72, राजद 74, जदयू 43, काँग्रेस 20, सीपीआयएल 12 आणि इतर जागांवर अन्य पक्ष आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक