शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जल्लोष नको, लगेचच पाटन्याकडे कूच करा; तेजस्वी यादवांचा उमेदवारांना संदेश

By हेमंत बावकर | Updated: November 8, 2020 17:27 IST

Bihar Election Result 2020 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडला. यामध्ये भाजपा-जदयू महायुती, काँग्रेस-राजद आघाडी आणि तिसरा पासवान यांचा पक्ष अशी तिरंगी लढत झाली. पासवान गटाने 25 जागांवर जदयूला फटका दिल्याचे सांगितले जात आहे.

बिहारच्या निवडणुकीचा धुरळा हळूहळू खाली बसू लागलेला असताना सर्वच पक्षांना निकालाचे वेध लागले आहेत. यातच काल जाहीर झालेल्या एक्झिट पोलनी तेजस्वी यादव यांच्या राजद आघाडीला बहुमताचे संकेत दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यामुळे कोरोना संकटात लढल्या गेलेल्या या निवडणुकीत विजयाचा जल्लोषही मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याची शक्यता आहे. यावर तेजस्वी यादव यांनी नेत्यांना महत्वाची सूचना जारी केली आहे. 

राजदच्या उमेदवारांनी विजयी झाल्यानंतर विजयाची रॅली किंवा जल्लोष साजरा करू नये. विजयाचा उत्सव जनता साजरा करेल. मतमोजणीवेळी उमेदवारांनी त्यांच्याच मतदार संघात रहावे आणि विजयी झालेल्यांनी त्यांना मिळालेले सर्टिफिकेट घेऊनच पटन्याकडे कूच करावे, असे आदेश दिले आहेत. 

विजयाची जल्लोष यात्रा काढल्याने सामान्य नागरिकांना त्रास होईल, हा संदेश उमेदवारांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजदने चार जणांची टीम बनविली आहे. यामध्ये सुनील सिंह, संजय यादव, श्याम रजक आणि जगदानन्द सिंह आहेत. महत्वाचे म्हणजे एक्झिट पोलनी विजयाचे संकेत दिल्याने पटन्यातील राजदच्या कार्यालयाची रंगरंगोटी आणि साफसफाईचे कामही जोरात सुरु करण्यात आले आहे. 

...तेव्हाच राजदची होळी, दिवाळी9 नोव्हेंबरला तेजस्वी यादव यांचा वाढदिवसही आहे. पहिल्यासारखाच यंदाही वाढदिवस साजरा केला जाईल. परंतू लालू प्रसाद यादव यांना जामिन मिळालेला नाही. शपथ ग्रहन समारंभाला ते उपस्थित राहू नयेत म्हणून काही लोकाचे प्रयत्न आहेत. लालू जेव्हा तुरुंगातून बाहेर येतील तेव्हाच आमची होळी आणि दिवाळी साजरी होईल, असे गदानंद सिंह यांनी सांगितले. लालू प्रसाद यादव यांच्या जामिन अर्जावरील सुनावणी सुटीमुळे 29 नोव्हेंबरला होणार आहे. लालू यांची प्रकृती खालावली असल्याचे रिम्सच्या डॉक्टरांनी सांगितले असून त्यांच्या किडन्या 25 टक्केच काम करत आहेत. लालू यांनी न्यायालयात 15 ते 20 आजारांची यादी दिली आहे. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडला. यामध्ये भाजपा-जदयू महायुती, काँग्रेस-राजद आघाडी आणि तिसरा पासवान यांचा पक्ष अशी तिरंगी लढत झाली. मात्र, चिराग पासवान यांनी तिन्ही टप्प्यांमध्ये महायुतीत न राहूनही मी भाजपासोबत, असाच नारा देत महायुतीची मते फोडण्याचे लक्ष्य ठेवले होते. यानुसार सर्व्हेमध्ये पासवान गटाने 25 जागांवर जदयूला फटका दिल्याचे सांगितले जात आहे. तर अन्य एजन्सींचेदेखील एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात 54.57 टक्के मतदान झाले असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव