शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

शिवसेना, अकाली दलानंतर भाजपाला आणखी एक धक्का; केंद्रीय मंत्र्यांच्या पार्टीने सोडली साथ

By प्रविण मरगळे | Published: October 04, 2020 7:40 PM

Bihar Assembly Election 2020 News: आज संध्याकाळी लोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णयबिहार विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्टीने सोडली साथजेडीयू नितीश कुमार यांच्या वैचारिक मतभेद असल्याचा हवाला देत स्वबळावर निवडणूक लढण्याचं केलं जाहीर

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आता लोक जनशक्ती पार्टीनेही एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच बिहारमध्ये भाजपाला धक्का बसला आहे. नितीश कुमार यांचे नेतृत्व मान्य नसल्याने लोक जनशक्ती पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत लोक जनशक्ती पार्टीने निवेदन जारी करत म्हटलंय की, राष्ट्रीय स्तरावरील लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टी भाजपासोबत कायम असेल. पण राज्यस्तरावर विधानसभा निवडणुकीत जनता दला यूनायटेडसोबत वैचारिक मतभेद असल्याने पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल. त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपाला धक्का बसू शकतो असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

खरं तर, या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष आरजेडी आपल्या पारंपारिक व्होटबँक मुस्लिम आणि यादव तसेच दलित मतदारांना एकत्र करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. पूर्वी जेडीयूचे दलित नेते श्याम रजकही आरजेडीमध्ये दाखल झाले. अशा परिस्थितीत आणखी एक दलित व्होटबँक असलेला पक्ष एनडीएतून बाहेर पडण्याचा फटका त्यांना सहन करावा लागू शकतो. इतकेच नव्हे तर बरेच लहान पक्षही युतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे मतदारांचा मूड कोणत्या दिशेने आहे हे येणार काळच ठरवेल.

आज संध्याकाळी लोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने जाहीर केले आहे की, ते स्वबळावर बिहार विधानसभा निवडणूक लढवतील. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि लोकसभा निवडणुकांमध्ये एलजेपीची भाजपाशी युती मजबूत असल्याचंही लोक जनशक्ती पार्टीने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत जनता दल (युनायटेड) यांच्या युतीमध्ये वैचारिक मतभेदांमुळे बिहारमध्ये एलजेपीने युतीपासून स्वतंत्रपणे लढण्याचं ठरवलं आहे.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी २८ ऑक्टोबर (७१ जागा), ३ नोव्हेंबर (९४ जागा) आणि ७ नोव्हेंबर (७८ जागा) अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BJPभाजपा