शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

Bihar Election 2020: बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होण्याची चाहूल; नितीश यांचं ठाकरेंच्या पावलावर पाऊल?

By कुणाल गवाणकर | Updated: October 29, 2020 12:48 IST

Bihar Election 2020: लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांचा मुख्यमंत्री नितीश कुमारांवर हल्लाबोल

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे. विधानसभेच्या ७१ जागांसाठी मतदान होत आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल, भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस असा मुकाबला होत आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानं वेगळीच खेळी केल्यानं निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे निकालानंतर नेमक्या काय घडामोडी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.लोकजनशक्ती पक्षानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाविरुद्ध उघड भूमिका घेतली आहे. लोकजनशक्ती पक्षानं संयुक्त जनता दलाविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत. मात्र भाजपविरुद्ध उमेदवार दिलेले नाहीत. लोकजनशक्ती पक्षाच्या या भूमिकेचा संयुक्त जनता दलाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर भाजपला यामुळे फायदा होईल. त्यातच आता चिराग पासवान यांनी नितीश कुमारांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात आहेत आणि ते निकालानंतर महाआघाडीसोबत जातील, असा गंभीर आरोप पासवान यांनी केला आहे.वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांची प्रॅक्टिस; "तो" Video व्हायरल 'नितीश कुमारांच्या पक्षाला मतदान केल्यास बिहार उद्ध्वस्त होईल. नितीश सतत राजदच्या संपर्कात आहेत. तेजस्वी यादव आणि नितीश कुमार एकच आहेत. यंदा आमचा पक्ष संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागांवर लढत आहे आणि आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकू,' असा विश्वास पासवान यांनी व्यक्त केला. 'नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली बिहारची अवस्था अतिशय बिकट आहे. हीच परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही मतं मागत आहोत,' असं पासवान पुढे म्हणाले."नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले..."; तेजस्वी यादवांचा सणसणीत टोलामहाराष्ट्राची पुनरावृत्ती होणार?चिराग पासवान यांचा आरोप खरा ठरल्यास बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल. राज्यात शिवसेना आणि भाजपनं युती करून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं. पण भाजप मुख्यमंत्रिपद देण्याचं वचन पाळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती?बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांची युती आहे. तर त्यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी मैदानात आहे. निवडणूक निकालानंतर नितीश कुमार भाजपचा विश्वालघात करून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत जातील, असा चिराग पासवान यांचा दावा आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये संयुक्त जनता दलानं राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबतच निवडणूक लढवली. पण काही महिन्यांनी त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपसोबत घरोबा केला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारUddhav Thackerayउद्धव ठाकरेJanta Dal Unitedजनता दल युनायटेडLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपा