शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

Bihar Election 2020: बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होण्याची चाहूल; नितीश यांचं ठाकरेंच्या पावलावर पाऊल?

By कुणाल गवाणकर | Updated: October 29, 2020 12:48 IST

Bihar Election 2020: लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांचा मुख्यमंत्री नितीश कुमारांवर हल्लाबोल

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे. विधानसभेच्या ७१ जागांसाठी मतदान होत आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल, भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस असा मुकाबला होत आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानं वेगळीच खेळी केल्यानं निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे निकालानंतर नेमक्या काय घडामोडी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.लोकजनशक्ती पक्षानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाविरुद्ध उघड भूमिका घेतली आहे. लोकजनशक्ती पक्षानं संयुक्त जनता दलाविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत. मात्र भाजपविरुद्ध उमेदवार दिलेले नाहीत. लोकजनशक्ती पक्षाच्या या भूमिकेचा संयुक्त जनता दलाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर भाजपला यामुळे फायदा होईल. त्यातच आता चिराग पासवान यांनी नितीश कुमारांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात आहेत आणि ते निकालानंतर महाआघाडीसोबत जातील, असा गंभीर आरोप पासवान यांनी केला आहे.वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांची प्रॅक्टिस; "तो" Video व्हायरल 'नितीश कुमारांच्या पक्षाला मतदान केल्यास बिहार उद्ध्वस्त होईल. नितीश सतत राजदच्या संपर्कात आहेत. तेजस्वी यादव आणि नितीश कुमार एकच आहेत. यंदा आमचा पक्ष संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागांवर लढत आहे आणि आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकू,' असा विश्वास पासवान यांनी व्यक्त केला. 'नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली बिहारची अवस्था अतिशय बिकट आहे. हीच परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही मतं मागत आहोत,' असं पासवान पुढे म्हणाले."नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले..."; तेजस्वी यादवांचा सणसणीत टोलामहाराष्ट्राची पुनरावृत्ती होणार?चिराग पासवान यांचा आरोप खरा ठरल्यास बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल. राज्यात शिवसेना आणि भाजपनं युती करून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं. पण भाजप मुख्यमंत्रिपद देण्याचं वचन पाळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती?बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांची युती आहे. तर त्यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी मैदानात आहे. निवडणूक निकालानंतर नितीश कुमार भाजपचा विश्वालघात करून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत जातील, असा चिराग पासवान यांचा दावा आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये संयुक्त जनता दलानं राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबतच निवडणूक लढवली. पण काही महिन्यांनी त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपसोबत घरोबा केला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारUddhav Thackerayउद्धव ठाकरेJanta Dal Unitedजनता दल युनायटेडLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपा