शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

Bihar Assembly Election Results: ...म्हणून नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत; संजय राऊतांनी सांगितलं राजकारण

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 16:09 IST

Bihar Assembly Election Results: संजय राऊत यांच्याकडून तेजस्वी यादवांचं तोंडभरुन कौतुक

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या भारतीय जनता पक्ष राज्यातला क्रमांक एकचा पक्ष होण्याकडे वाटचाल करत आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) मोठा फटका बसला आहे. जेडीयूला सध्या ५० पेक्षा कमी जागांवर आघाडी आहे. गेल्या निवडणुकीत जेडीयूनं ७१ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा त्यांना मोठं नुकसान होताना दिसत आहे. भाजपनं जास्त जागा जिंकल्यानं मुख्यमंत्रिपद कोणाला याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. बिहार निवडणुकीत शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही; सर्व २२ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदानभाजपला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या तरीही मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार, असं भाजप नेत्यांनी वारंवार स्पष्ट केलं. बिहारचा विनाअडथळा विकास व्हावा यासाठी नितीश यांचं सरकार आणा, असं आवाहन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारी जनतेला केलं. आताही भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी तशीच भूमिका मांडली आहे. यावर शिवसेनेने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?शब्द पाळला नाही, तर काय होतं याचा अनुभव भाजपनं महाराष्ट्रात घेतलेला आहे. त्यामुळेच आता बिहारमध्ये भाजपनं सावध भूमिका घेतल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. 'भाजपनं शिवसेनेलाही मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. जागा कमी जास्त आल्या तरीही मुख्यमंत्रिपद देऊ असं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे शिवसेनेनं पलटवार केला. त्यामुळेच आता भाजप आपल्या मित्रपक्षांना दिलेला शब्द पाळत आहे. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानायला हवेत,' असं राऊत म्हणाले.भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?सध्याच्या कलांमध्ये बिहारमध्ये एनडीए पुढे असली तरीही आपण निकालांची वाट पाहायला हवी, असं राऊत यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी राजदचे नेते आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचं तोंडभरून कौतुक केलं. तेजस्वी यादवांच्या रुपानं बिहारला एक नवा चेहरा मिळाला आहे. तेजस्वी यादव यांनी एनडीएला दिलेली लढत पाहता तेच मॅन ऑफ द मॅच आहेत. ३० वर्षांचे तेजस्वी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमारांविरोधात एकटे लढले, अशी स्तुतीसुमनं राऊत यांनी उधळली.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा