शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Bihar Assembly Election Result : तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 11:29 IST

Bihar Elections 2020 Sanjay Raut And Tejashwi Yadav : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तेजस्वी पर्व सुरू होईल असं म्हटलं आहे. 

मुंबई - बिहारमधील विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Elections 2020) निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये  (Bihar Assembly Election 2020 Exit Poll ) तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या महाआघाडीत राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. तर दुसरीकडे नितीशकुमारांनाही बिहारमध्ये पुन्हा त्यांचंच सरकार येईल, अशी आशा आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तेजस्वी पर्व सुरू होईल असं म्हटलं आहे. 

संजय राऊत यांनी मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "बिहारमध्ये पूर्ण निकाल यायचे आहेत. जे कल पाहिले आहेत. त्यावरून तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. एका तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन ताकद उभी केली आहे. सध्या तिथे कांटे की टक्कर सुरू आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल, मंगलराज सुरू होईल" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

"तरुण नेत्याने केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन उभी केली ताकद"

"बिहारमध्ये तरुणाने ज्या पद्धतीनं सर्वांसमोर आव्हान उभं केलं. ज्याप्रमाणे तो लढत आहे. मला वाटत हा एक चांगला संकेत आहे. जंगलराजविषयी बोललं जात होतं. 15 वर्षे बिहारमध्ये कोण सत्तेत होतं? कोणाचं जंगलराज सुरू होतं? मला वाटतं लोक जंगलराज विसरतील आणि तेजस्वींच्या नेतृत्वात मंगलराज सुरू होईल" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी "तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची असते" असं राऊत यांनी म्हटलं होतं.

"तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची"

"बिहार विधानसभा निवडणुकीचं एकंदर चित्र पाहिलं तर उद्या तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण जनभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही" असं राऊत यांनी म्हटलं होतं. "ज्या मुलाच्या पाठीमागे सध्या पाठबळ नाही. त्याच्या घरातली माणसं तुरुंगात आहे. मग ती कोणत्याही कारणास्तव असो. त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे इन्कम टॅक्स, सीबीआयचा ससेमिरा लावला जात आहे. तोच तरुण मुलगा हजारो लाखोंच्या सभा घेतोय आणि केंद्रीय राजसत्तेला आव्हान निर्माण करतोय. मला वाटतं बिहारच्या निवडणुकीचं एकंदर चित्र पाहिलं तर उद्या तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण जनभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही" असं राऊत यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारSanjay Rautसंजय राऊतTejashwi Yadavतेजस्वी यादवElectionनिवडणूक