शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
6
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
7
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
8
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
9
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
10
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
11
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
12
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
13
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
14
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

Bihar Assembly Election 2020: शिवसेना बिहारमध्ये लढणार; पण 'ती' खास ओळख सोबत नसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 6:13 AM

Bihar Assembly Election 2020: शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले की, ५० जागा लढवाव्या अशी बिहारमधील कार्यकर्त्याची मागणी आहे. पण ३० ते ४० जागा लढवण्याचा आमचा विचार असून, दोन दिवसांत निर्णय होईल.

मुंबई : शिवसेनेने बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नसल्याने निवडणूक आयोग ठरवेल त्या चिन्हावर त्यांना लढावे लागणार आहे.शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले की, ५० जागा लढवाव्या अशी बिहारमधील कार्यकर्त्याची मागणी आहे. पण ३० ते ४० जागा लढवण्याचा आमचा विचार असून, दोन दिवसांत निर्णय होईल.बिहारमध्ये सत्तारुढ जदयुचे निवडणूक चिन्ह धनुष्य आहे. अन्य पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले तर मतदारांचा गोंधळ होईल, असा आक्षेप जदयुने झारखंड मुक्ती मोर्चाबाबत घेतला होता. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा हा सत्तारुढ पक्ष असून त्याचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. जदयुचा हा आक्षेप मान्य करीत आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह देण्यास मनाई केली. तोच आदेश शिवसेनेलाही लागू राहील.सध्या नाही एकही जागाबिहारमध्ये उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी खा.अनिल देसाई, खा.प्रियांका चतुर्वेदींवर आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१५ च्या निवडणुकीत सेनेने ८० जागा लढविल्या. एकही जागा जिंकली नव्हती. सेनेच्या सर्व उमेदवारांना मिळून २,११,१३१ मते मिळाली होती. पक्षाचे सात उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना १,८५,४३७ मते मिळाली होती.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत