शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

मोदींमुळे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर, अनंत गीते यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:06 AM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

रोहा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल तर देशाचे नेतृत्व हे नरेंद मोदींकडे असणे खूप आवश्यक आहे, असे प्रतिपादन या वेळी खासदार अनंत गीते यांनी केले. रोहा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.भाजप नेते अ‍ॅड. महेश मोहिते आपल्या भाषणात म्हणाले की, खासदार अनंत गीते यांचे स्वच्छ चारित्र्य आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत एकसुद्धा आरोप झालेला नाही. रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी, लोकांच्या प्रश्नांची आपल्याला जाण आहे, हा समीर शेडगे लोकांची कामे करतो, ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतो, माझ्याकडे जे कोणी येतात, त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो, गीते माझ्या सर्व प्रश्नांची दखल घेतात, कुणाला आरोग्य मदत, तर कुणाला शिफारस, कुणाला रस्ता, तर कुणाला नोकरी, प्रश्न काहीही असोत, लोकांच्या कामांना गीते नेहमी प्राधान्य देतात. आजवर कधीही त्यांनी मला निराश केलेले नाही. तरी गावातल्या लोकांना विनंती करतो, आपले मत एका प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला द्या. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, नावीद अंतुले, कामगार नेते सूर्यकांत महाडीक, शिवसेना नेते सुलतान मुकादम आदी भाजप-सेनेचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Anant Geeteअनंत गीतेraigad-pcरायगड