शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

“...तर मला क्लीनचीट द्यावी; माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 14:49 IST

Vidhan Sabha Adhiveshan Live Update: या प्रकरणाबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवाल मागवण्यात यावा. खरचं मी गुन्हा केला तर असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जायला तयार आहे असं त्यांनी विधानसभेत सांगितले.

ठळक मुद्देमाझ्याविरोधात गुन्हा नाही, मी कुठेही गायब झालो नव्हतो. घोटाळाच झाला नसेल आणि आर्थिक गुन्हे शाखेचा तपास पूर्ण झाला असेल तर मला राज्य सरकारकडून या प्रकरणात क्लीनचीट द्यावीलवकरात लवकर हा अहवाल गृहमंत्र्यांनी सादर करावा. तो लोकांपर्यंत पोहचवावा. जेणेकरून लोकांसमोर सत्य समोर येईल

मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षावरून झालेल्या गोंधळात भाजपाचे १२ आमदार निलंबित झाले. आज दुसऱ्या दिवशी विधानसभेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला आहे. माझ्यावर झालेले आरोप म्हणजे ठाकरे सरकारवरील आरोप आहेत असं सरनाईकांनी म्हटलं आहे.

विधानसभेत प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) म्हणाले की, माझ्यावर आरोप करून विनाकारण सरकारची बदनामी केली जाते. जर मी गुन्हा केला असेल तर शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु गुन्हाच केला नसेल तर मला या आरोपातून क्लीनचीट देण्यात यावी अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे. घोटाळा झालेला आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. MMRDA विभाग राज्य सरकारच्या अंतर्गत येतो. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने माझ्यावर आरोप करण्यात आले. याबाबत मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्र दिलं आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या प्रकरणाबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवाल मागवण्यात यावा. खरचं मी गुन्हा केला तर असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जायला तयार आहे. मिळेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. पण घोटाळाच झाला नसेल आणि आर्थिक गुन्हे शाखेचा तपास पूर्ण झाला असेल तर मला राज्य सरकारकडून या प्रकरणात क्लीनचीट द्यावी. लवकरात लवकर हा अहवाल गृहमंत्र्यांनी सादर करावा. तो लोकांपर्यंत पोहचवावा. जेणेकरून लोकांसमोर सत्य समोर येईल असंही प्रताप सरनाईक म्हणाले.

याआधी प्रताप सरनाईक काय म्हणाले होते?

माझ्याविरोधात गुन्हा नाही, मी कुठेही गायब झालो नव्हतो. माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात होता किंवा आरोप केला जात होते, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता. आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. यामध्ये मी चुकीचं काही केलं असं वाटत नाही, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं होते.  

माझ्या पक्षाच्या प्रतोदाने व्हीप बजावला आहे. त्यामुळे अधिवेशनाला आलो. देशात माझ्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल नाही. माझ्यावर कुणीही लेखी स्वरुपात आरोप केलेला नाही. मी कोणत्याही घोटाळ्यात असल्याचा कुणीही जबाब दिलेला नाही. एमएमआरडीएच्या प्रकरणात माझ्यावर आरोप झाले. त्यावर एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि ईडीकडे स्टेटमेंट दिलं आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तसेच देश सोडून जायला मी काही नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्या नाही, असंही प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं होते.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसmmrdaएमएमआरडीए