शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मोदी सरकारने राबविलेली सर्व धोरणे अपयशी- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 00:09 IST

आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्थेतही सरकारच्या हस्तक्षेपाची टीका

पनवेल : नोटाबंदी, जीएसटी सारखी मोदींनी राबविलेली धोरणे अपयशी ठरली आहेत. सर्वसामान्यांसह लघु-उद्योजकांचे यामध्ये कंबरडे मोडले आहे. आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्थेतही मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने देश अराजकतेकडे चालला असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खारघरमध्ये केली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.देशात कधी नव्हे ते सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद आयोजित करून मोदी सरकारच्या न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेपाचा पाढा वाचला, तसेच रिझर्व्ह कामकाजातही मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने रिझर्व्ह बँकेचे गव्हरर्नर ऊर्जित पटेल यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे या वेळी नमूद केले. काँग्रेसच्या राजवटीत सरकारने शेतकऱ्यांचा ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. तुम्ही काय केले? याचे उत्तर द्या. जवाहरलाल नेहरू, गांधी कुटुंबीयांनी देशासाठी काय केले? हा प्रश्न मोदी विचारत आहेत. राजीव गांधींनी देशात तंत्रज्ञान, दळणवळण तसेच आधुनिकता आणली, हे विसरता येणार नसल्याचे ते म्हणाले. मोदी हे हिंदुत्वाचा प्रचार करतात. पंतप्रधान कुठल्या एका धर्माचा नसतो तर सर्व जाती धर्माचा असतो, याचा उल्लेख त्यांनी अखेरीस केला.आपल्या भाषणात सतत ट्रोल होणाºया पार्थ पवार यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील आमदार, खासदार मोठ्या प्रमाणात सेना-भाजपचे आहेत. मात्र, आजही या मतदारसंघातील प्रश्न सुटलेले नाहीत. अजित पवारांवर झालेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपाचे उत्तर या वेळी पार्थ यांनी दिले. विनाकारण खोटे आरोप करून बाळगंगा व कोंढाणे धरणाचे काम थांबविले आहे. ही कामे वेळेत पूर्ण झाली असती तर परिसराला सुमारे १०० एमएलडी पाणी दररोज मिळाले असते, असा दावा त्यांनी या वेळी केला. सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, डॉ. राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.गर्दी जमविण्यासाठी धावपळखारघरसारख्या शहरी भागात आयोजित सभेला शरद पवार यांचे आगमन झाले तरी गर्दी जमली नव्हती. पाठीमागच्या अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. ही बाब आयोजकांच्या लक्षात येताच गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागली.साडेबारा टक्केच्या ऐतिहासिक निर्णयाची आठवणमी मुख्यमंत्री असताना साडेबारा टक्के विकसित जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा निर्णय घेतला. माजी खासदार दि. बा. पाटील यांचे योगदान याकरिता महत्त्वाचे होते. या निर्णयामुळे नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळाले, असे म्हणत सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्केच्या घेतलेल्या निर्णयाची आठवण शरद पवार यांनी करून दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळSharad Pawarशरद पवारparth pawarपार्थ पवार