शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शरद पवारांनी नातवाचे कान टोचले; अजित पवारांनी ‘सिल्व्हर ओक’ गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 06:42 IST

बैठक पूर्वनियोजित; जयंत पाटील यांनी केली सारवासारव

मुंबई : माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, तो अपरिपक्व आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांचे कान टोचताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवारांचे निवासस्थान असलेले ‘सिल्व्हर ओक’ गाठल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अलिकडच्या काळात पक्षाशी विसंगत भूमिका घेतली आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती, तर ‘जय श्रीराम’ म्हणत राम मंदिराच्या समर्थनार्थ त्यांनी नुकतेच खुले पत्र लिहिले आहे. पार्थ यांच्या या भूमिकेबद्दल पत्रकारांनी विचारले असता ‘पार्थ अपरिपक्वआहे. त्याचा अनुभव तोकडा आहे. त्याच्या बोलण्याला मी काडीची किमंत देत नाही’ अशा शब्दांत खा. पवार यांनी फटकारले.शरद पवार यांचे हे वक्तव्य वृत्त वाहिन्यांवर झळकताच मंत्रिमंडळाची बैठक सोडून अजित पवार यांनी थेट शरद पवारांचे निवासस्थान गाठले. त्यानंतर राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तेथे पोहोचले. त्यामुळे चर्चा सुरू झाली. मात्र, ही बैठक पूर्वनियोजित होती, असे सांगत पवार कुटुंबीयात कसलाही वाद नसल्याचा खुलासा जंयत पाटील यांनी केला. पाटील म्हणाले, पार्थ पवारांबाबत कसलीही चर्चा झाली नाही. पार्थने काही मते मांडली असतील तर ती मतं मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अजितदादांनी मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यावर सोडली नाही. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन ते बाहेर पडले. सुशांतप्रकरणी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे त्यावर पुन्हा वेगळे काही सांगण्याची गरज नाही, असे सांगत पाटील यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारले असता, हा पवार कुटुंबातील वाद आहे, त्यावर आपण बोलणे योग्य नसल्याचे सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिक भाष्य करणे टाळले.अजित पवारांचे सूचक मौनपार्थने केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यानंतर राम मंदिराच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पत्रावर आजोबांनी पार्थची कान टोचले, मात्र वडील अजित पवार यांनी कोणतेही भाष्य केले नाही. अजितदादांचे हे मौन सूचक असल्याचे अर्थ काढले जात आहे.मुंबई पोलिसांवर विश्वास; पण सीबीआयला हरकत नाही : पवारसुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला करायचा असेल तर आपली त्याला हरकत नाही. मात्र मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. सुशांत चांगला अभिनेता होता. त्याची आत्महत्या वेदनादायी आहे, पण माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण त्याची मीडियाने दखल घेतली नाही, असा टोलाही त्यांनी मीडियाला लगावला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारparth pawarपार्थ पवार