शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बिहार निकालानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 06:15 IST

कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह  : ‘त्या’ नेत्यांचा पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल

 शीलेश शर्मा    लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अत्यंत ढिसाळ कामगिरीनंतर पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावर पुन्हा ठिणगी पडली आहे. काही दिवसापूर्वी पक्षनेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे नेते यानिमित्ताने पुन्हा सक्रिय झाले आहेत. टीका करणाऱ्या २३ नेत्यांचा आवाज दाबण्यात आला होता. परंतु आता बिहार आणि देशाच्या इतर भागातील पोटनिवडणुकांच्या निकालानंतर या नेत्यांनी नव्याने आपला आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष खासदार कपिल सिब्बल आणि कार्ती चिदंबरम यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा इशारा कार्ती चिदंबरम यांनी दिला आहे. कपिल सिब्बल यांनी निवडणूक निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.सिब्बल यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी आणि त्यांच्या टीमवर शाब्दिक हल्ला चढवीत मत मांडण्यास कुठलेही व्यासपीठ नसल्याने नाईलाजास्तव आपल्याला जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. आज पक्षाला अनुभवी, राजकीय परिस्थितीची जाण असणाऱ्या आणि संघटन बळकट करण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना पुढे आणण्याची गरज आहे. आता आत्मचिंतनाची वेळ निघून गेली आहे. पक्षाला सशक्त नेतृत्व आवश्यक आहे. पक्ष कमकुवत झाला असल्याचे निवडणूक निकालानंतर सिद्ध झाले आहे. हे स्वीकारावे लागेल, असा घणाघात त्यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी महाआघाडीच्या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडत राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला. अर्थात राजदचे खासदार मनोज झा यांनी परिस्थिती सांभाळत हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, काँग्रेसचे नाही, असा खुलासा केला. परंतु निकालानंतर काँग्रेसच्या त्रुटी उघड झाल्या असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस  तारिक अन्वर यांनीही  मान्य  केले  आहे. 

काँग्रेससाठी पराभव ही सामान्य घटना काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटनेसारखा झाला आहे. बिहार निवडणुका आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल अद्याप कोणताही विचार झालेला नाही. कदाचित त्यांना असे वाटत असेल की, सगळं काही ठीक आहे आणि ही सामान्य घटना आहे, असेही सिब्बल म्हणाले.

जनतेपर्यंत पोहोचण्याची गरजपक्षाच्या सुधारणेसंदर्भातील उपायांबद्दल सिब्बल म्हणाले, सर्वप्रथम आपल्याला संवादाची प्रक्रिया सुरू करावी लागेल. आम्हाला युतीची गरज आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचीही गरज आहे. जनता आमच्याकडे येईल याची आम्ही अपेक्षा करू शकत नाही. आमच्याकडे आता पूर्वीसारखी ताकद नाही. ज्यांना राजकीय अनुभव आहे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे; परंतु या सुधारणेसाठी पहिल्यांदा विचारमंथन आवश्यक आहे.

बंडखोरीचा राग    आळवणारे सक्रियएकूणच बंडखोरीचा राग आळवणारे काँग्रेस नेते पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद यांना बाजूला सारण्यासाठी पंचायत निवडणुकात त्यांच्या समर्थकांना नेतृत्वाच्या इशाऱ्यावरुन तिकीट नाकारण्यात येत आहे. फारुख अब्दुल्ला-मेहबुबा यांच्या आघाडीसोबत निवडणूक समझोता करू नये. कारण यामुळे जम्मूत काँग्रेसचे नुकसान होईल, असे आझाद यांचे मत होते. परंतु काँग्रेस नेतृत्वाने समझोता करण्याचा निर्णय घेऊन तुमच्या मताची पक्षाला गरज नसल्याचे संकेतच त्यांना दिले.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीkapil sibalकपिल सिब्बलBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक