शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निकालानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 06:15 IST

कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह  : ‘त्या’ नेत्यांचा पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल

 शीलेश शर्मा    लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अत्यंत ढिसाळ कामगिरीनंतर पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावर पुन्हा ठिणगी पडली आहे. काही दिवसापूर्वी पक्षनेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे नेते यानिमित्ताने पुन्हा सक्रिय झाले आहेत. टीका करणाऱ्या २३ नेत्यांचा आवाज दाबण्यात आला होता. परंतु आता बिहार आणि देशाच्या इतर भागातील पोटनिवडणुकांच्या निकालानंतर या नेत्यांनी नव्याने आपला आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष खासदार कपिल सिब्बल आणि कार्ती चिदंबरम यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा इशारा कार्ती चिदंबरम यांनी दिला आहे. कपिल सिब्बल यांनी निवडणूक निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.सिब्बल यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी आणि त्यांच्या टीमवर शाब्दिक हल्ला चढवीत मत मांडण्यास कुठलेही व्यासपीठ नसल्याने नाईलाजास्तव आपल्याला जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. आज पक्षाला अनुभवी, राजकीय परिस्थितीची जाण असणाऱ्या आणि संघटन बळकट करण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना पुढे आणण्याची गरज आहे. आता आत्मचिंतनाची वेळ निघून गेली आहे. पक्षाला सशक्त नेतृत्व आवश्यक आहे. पक्ष कमकुवत झाला असल्याचे निवडणूक निकालानंतर सिद्ध झाले आहे. हे स्वीकारावे लागेल, असा घणाघात त्यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी महाआघाडीच्या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडत राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला. अर्थात राजदचे खासदार मनोज झा यांनी परिस्थिती सांभाळत हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, काँग्रेसचे नाही, असा खुलासा केला. परंतु निकालानंतर काँग्रेसच्या त्रुटी उघड झाल्या असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस  तारिक अन्वर यांनीही  मान्य  केले  आहे. 

काँग्रेससाठी पराभव ही सामान्य घटना काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटनेसारखा झाला आहे. बिहार निवडणुका आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल अद्याप कोणताही विचार झालेला नाही. कदाचित त्यांना असे वाटत असेल की, सगळं काही ठीक आहे आणि ही सामान्य घटना आहे, असेही सिब्बल म्हणाले.

जनतेपर्यंत पोहोचण्याची गरजपक्षाच्या सुधारणेसंदर्भातील उपायांबद्दल सिब्बल म्हणाले, सर्वप्रथम आपल्याला संवादाची प्रक्रिया सुरू करावी लागेल. आम्हाला युतीची गरज आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचीही गरज आहे. जनता आमच्याकडे येईल याची आम्ही अपेक्षा करू शकत नाही. आमच्याकडे आता पूर्वीसारखी ताकद नाही. ज्यांना राजकीय अनुभव आहे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे; परंतु या सुधारणेसाठी पहिल्यांदा विचारमंथन आवश्यक आहे.

बंडखोरीचा राग    आळवणारे सक्रियएकूणच बंडखोरीचा राग आळवणारे काँग्रेस नेते पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद यांना बाजूला सारण्यासाठी पंचायत निवडणुकात त्यांच्या समर्थकांना नेतृत्वाच्या इशाऱ्यावरुन तिकीट नाकारण्यात येत आहे. फारुख अब्दुल्ला-मेहबुबा यांच्या आघाडीसोबत निवडणूक समझोता करू नये. कारण यामुळे जम्मूत काँग्रेसचे नुकसान होईल, असे आझाद यांचे मत होते. परंतु काँग्रेस नेतृत्वाने समझोता करण्याचा निर्णय घेऊन तुमच्या मताची पक्षाला गरज नसल्याचे संकेतच त्यांना दिले.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीkapil sibalकपिल सिब्बलBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक