शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

5, 8, 32...! बिहारची बाजी कधीही पलटेल अशी अवस्था; 123 जागांवर 3000 हून कमी आघाडी

By हेमंत बावकर | Updated: November 10, 2020 15:35 IST

Bihar Election Result 2020 : सध्याच्या कलानुसार भाजपा 76, राजद, 66, जदयू 48, काँग्रेस 21 आणि एलजेपी 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे.

बिहारमध्ये आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या राजद-काँग्रेस आघाडीने मुसंडी मारलेली असताना अचानक एनडीएने कमबॅक करत जवळपास 130 जागांवर आघाडी मिळविली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार असल्याचे सांगत सर्वच पक्षांचे टेन्शन वाढविले आहे.

महत्वाचे म्हणजे सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांमध्ये अनेक उमेदवारांना 5,8, 32 ते 3000 मतांचे लीड मिळालेले आहे. मात्र, हे लीड कधीही तुटण्याची शक्यता असून सध्या सुरु असलेली बाजी कधीही पलटणार आहे. 

सध्याच्या कलानुसार भाजपा 76, राजद, 66, जदयू 48, काँग्रेस 21 आणि एलजेपी 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. यापैकी बऱ्याचशा जागा या नितीशकुमारांच्या जदयू आणि भाजपाच्या आहेत. एनडीएसह राजदचे उमेदवार 5, 8, 32 अशा मतफरकाने आघाडीवर आहेत. हा फरक काही मतांचा असल्याने मतांच्या पॉकेटवर सारे गणित ठरणार आहे. एखाद्या उमेदवाराचे, पक्षाचे प्राबल्य असलेल्या ठिकाणची ईव्हीएम मोजणीला आल्यास हे मताधिक्य पुन्हा खाली-वर होणार आहे. ही आकडेवारी दुपारी २ च्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर आहे. 

दुपारी १ वाजताच्या आकडेवारीनुसार 166 जागांवरील मताधिक्य हे 5000 हून कमी होते. तर 123 जागांवरील पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवाराच्या मतांचा फरक हा 3000 मतांहूनही कमी होता. 80 जागांवर हा आकडा 2000 हून कमी होता. 49 जागांवर हा आकडा 1000, तर 20 जागांवर मिळालेले मताधिक्य हे 500 हूनही कमी होते. सात जागांवर तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आघाडी मिळालेली आहे. या जागा बिहारच्या निकालाचे रुपडेच पालटण्याची शक्यता आहे.  

निकाल मध्यरात्रीबिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकते अशी स्थिती आहे. याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा