शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल का?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 23:39 IST

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय वाटतं; वाचा जनतेचा कौल

मुंबई: दीड वर्षांपूर्वी राज्यात सत्तासंघर्ष अगदी टिपेला पोहोचला होता. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं बिनसलं. त्यानंतर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडला आणि थेट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करत राज्यात सरकार स्थापन केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण राज्यात अस्तित्वात आलेलं महाविकास आघाडी लवकरच पडणार असल्याचं भाजपच्या नेत्यांनी अनेकदा म्हटलं. मात्र दीड वर्षानंतरही महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे.ठाकरे सरकारनं कोरोना संकट योग्यपणे हाताळलं का?; राज्यातील जनता म्हणते...महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. हे सरकार अंतर्गत कलहामुळे कोसळेल. मग आम्ही राज्यातल्या जनतेला पर्याय देऊ, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा वृत्तवाहिनीनं एक सर्वेक्षण केलं. महाविकास आघाडी सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना विचारण्यात आला. त्यावर ४४ टक्के लोकांनी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असं मत नोंदवलं. तर ३० टक्के लोकांनी नाही असं मत व्यक्त केलं. तर २६ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराखाली आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा डागळली आहे का, असा प्रश्न सर्वेक्षणात सहभाग नोंदवणाऱ्यांना विचारण्यात आला. त्यावर ४३ टक्के लोकांनी होय, २९ टक्के लोकांनी नाही, तर २८ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलं. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. मात्र वाझेंविरोधातच राष्ट्रीय तपास यंत्रणेला पुरावे सापडले. त्यामुळे वाझेंना निलंबित करावं लागलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत वाझेंचं समर्थन केलं होतं. या प्रकरणामुळे गृह खात्यानं विश्वासार्हता गमावल्याचं मत ४८ टक्के जणांनी व्यक्त केलं. तर यामुळे गृह खात्यानं विश्वासार्हता गमावली नसल्याचं २५ टक्के जणांना वाटतं. तर २७ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानी