शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

भाजप आमदारांच्या निलंबनाचा विषय राज्यपालांकडे; १२ आमदारांनी घेतली कोश्यारींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 18:49 IST

राज्यपालांकडून योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन; आशिष शेलार यांची माहिती

मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेचं पर्यवसान आधी शाब्दिक वादात, आरोप-प्रत्यारोपात, नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झालं. शेवटी, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाई करण्यात आली. भाजपच्या निलंबित आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत स्वत:ची बाजू त्यांच्यासमोर मांडली. या प्रकरणी यथोचित कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन राज्यपालांनी दिल्याचं आमदारांनी सांगितलं.

'विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आज घडलेल्या प्रकाराबद्दलची माहिती आम्ही राज्यपालांना दिली. त्यांच्याकडे आम्ही सत्यकथन केलं. घडलेल्या घटनेबद्दलचा अहवाल मागवून त्यासंदर्भात उचित कार्यवाही करण्याची विनंती आमच्याकडून राज्यपालांना करण्यात आली. राज्यपालांनी आमची बाजू ऐकून घेतली. त्यांनी काही प्रतिप्रश्न केले. त्यानंतर त्यांनी योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली,' अशी माहिती निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'आम्ही सभागृहात अपशब्द वापरला नाहीच. आम्ही तालिका अध्यक्षांच्या दालनातही कोणताही अनुचित शब्द वापरला नाही. आमच्यावर करण्यात आलेली कारवाई एकतर्फी आहे. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली गेली नाही. निलंबित करण्यात आलेले अनेक सदस्य तर पीठासीन अधिकाऱ्यांजवळ गेलेच नव्हते, ते दालनातही उपस्थित नव्हते. मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई केली गेली. लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा काढण्याचं काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे,' अशी घणाघाती टीका शेलार यांनी केली.

विधानसभेतील आमचे आकडे तोकडे करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असेल, तर त्यात यश येणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. भाजपचं संख्याबळ कमी करून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मानस असल्यास तसं काहीही होऊ शकणार नाही. कारण ती निवडणूकच बेकायदेशीर असेल, असंही शेलार पुढे म्हणाले. '२०२२ मध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार षडयंत्र रचत आहे. जनतेमध्ये चुकीची माहिती पोहोचवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पीठासीन अधिकाऱ्यांजवळ, तालिका अध्यक्षांच्या दालनात ४-५ आमदार होते. मग १२ आमदारांचं निलंबन कसं काय केलं?' असा सवाल निलंबित आमदार संजय कुटे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलार