शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

आयटी इंजिनियर्सच्या रोजगाराचं काय होणार? हिंजवडी आयटीनगरीतील ३७ कंपन्यांचे स्थलांतर

By विश्वास मोरे | Updated: May 30, 2024 12:21 IST

कंपन्यामधे येणारे पाहुणे किंवा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागतो, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे मत

पिंपरी : आयटीनगरी म्हणून जागतिक नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रस्ते, वाहतूक, आयटी इंजिनियर्सला राहण्यायोग्य वातावरण उपलब्ध नसणे, आरोग्य आणि विविध नागरी सुविधांचा अभाव असल्याने कंपन्यांनी स्थलांतर केल्याचे हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे मत आहे. 

पुण्यालगत असणाऱ्या हिंजवडी परिसरामध्ये सन १९९७ पासून आयटीनगरी उभारण्याचे काम सुरू झाले. तत्कालीन केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन आणि राज्याचे उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते सन २००० मध्ये या नगरीचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर हिंजवडी आयटीनगरी ही जागतिक नकाशावर ओळखली जात आहे. या ठिकाणी दीडशेहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कंपन्या आहेत. त्यामुळे देशभरातील लाखो आयटी इंजिनियर्सला रोजगार मिळालेला आहे. आयटीनगरी शेजारी असणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे.

काय आहेत कंपन्या स्थलांतराची कारणे?

हिंजवडी आयटीपार्कचा परिसर हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारित येतो. आयटीनगरीत जाण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून अभियंत्यांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास करावा लागतो. त्याचबरोबर विविध समस्यांना आयटीयन्सला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामावर परिणाम होत आहे. आयटी इंजिनिअरचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये परिसरातील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. त्यातील काही कंपन्या मगरपट्टा सिटी, चेन्नई, हैदराबाद अशा विविध भागांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.

हिंजवडी आयटीपार्कमधून बाहेर आल्यानंतर आयटी अभियंत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या कंपन्यामधे  येणारे पाहुणे किंवा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी त्यांना येण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. तसेच जवळपासच्या परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. येथील प्रश्नांबाबत राज्य शासनाचे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे, त्यावर उपयोजना होण्याची गरज आहे. अन्यथा आणखी कंपन्या बाहेर जातील. - कर्नल योगेश जोशी (सचिव, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन. )

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानEmployeeकर्मचारीMONEYपैसाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUnemploymentबेरोजगारी