शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयटी इंजिनियर्सच्या रोजगाराचं काय होणार? हिंजवडी आयटीनगरीतील ३७ कंपन्यांचे स्थलांतर

By विश्वास मोरे | Updated: May 30, 2024 12:21 IST

कंपन्यामधे येणारे पाहुणे किंवा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागतो, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे मत

पिंपरी : आयटीनगरी म्हणून जागतिक नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रस्ते, वाहतूक, आयटी इंजिनियर्सला राहण्यायोग्य वातावरण उपलब्ध नसणे, आरोग्य आणि विविध नागरी सुविधांचा अभाव असल्याने कंपन्यांनी स्थलांतर केल्याचे हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे मत आहे. 

पुण्यालगत असणाऱ्या हिंजवडी परिसरामध्ये सन १९९७ पासून आयटीनगरी उभारण्याचे काम सुरू झाले. तत्कालीन केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन आणि राज्याचे उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते सन २००० मध्ये या नगरीचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर हिंजवडी आयटीनगरी ही जागतिक नकाशावर ओळखली जात आहे. या ठिकाणी दीडशेहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कंपन्या आहेत. त्यामुळे देशभरातील लाखो आयटी इंजिनियर्सला रोजगार मिळालेला आहे. आयटीनगरी शेजारी असणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे.

काय आहेत कंपन्या स्थलांतराची कारणे?

हिंजवडी आयटीपार्कचा परिसर हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारित येतो. आयटीनगरीत जाण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून अभियंत्यांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास करावा लागतो. त्याचबरोबर विविध समस्यांना आयटीयन्सला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामावर परिणाम होत आहे. आयटी इंजिनिअरचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये परिसरातील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. त्यातील काही कंपन्या मगरपट्टा सिटी, चेन्नई, हैदराबाद अशा विविध भागांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.

हिंजवडी आयटीपार्कमधून बाहेर आल्यानंतर आयटी अभियंत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या कंपन्यामधे  येणारे पाहुणे किंवा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी त्यांना येण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. तसेच जवळपासच्या परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. येथील प्रश्नांबाबत राज्य शासनाचे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे, त्यावर उपयोजना होण्याची गरज आहे. अन्यथा आणखी कंपन्या बाहेर जातील. - कर्नल योगेश जोशी (सचिव, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन. )

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानEmployeeकर्मचारीMONEYपैसाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUnemploymentबेरोजगारी