शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

आयटी इंजिनियर्सच्या रोजगाराचं काय होणार? हिंजवडी आयटीनगरीतील ३७ कंपन्यांचे स्थलांतर

By विश्वास मोरे | Updated: May 30, 2024 12:21 IST

कंपन्यामधे येणारे पाहुणे किंवा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागतो, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे मत

पिंपरी : आयटीनगरी म्हणून जागतिक नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रस्ते, वाहतूक, आयटी इंजिनियर्सला राहण्यायोग्य वातावरण उपलब्ध नसणे, आरोग्य आणि विविध नागरी सुविधांचा अभाव असल्याने कंपन्यांनी स्थलांतर केल्याचे हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे मत आहे. 

पुण्यालगत असणाऱ्या हिंजवडी परिसरामध्ये सन १९९७ पासून आयटीनगरी उभारण्याचे काम सुरू झाले. तत्कालीन केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन आणि राज्याचे उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते सन २००० मध्ये या नगरीचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर हिंजवडी आयटीनगरी ही जागतिक नकाशावर ओळखली जात आहे. या ठिकाणी दीडशेहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कंपन्या आहेत. त्यामुळे देशभरातील लाखो आयटी इंजिनियर्सला रोजगार मिळालेला आहे. आयटीनगरी शेजारी असणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे.

काय आहेत कंपन्या स्थलांतराची कारणे?

हिंजवडी आयटीपार्कचा परिसर हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारित येतो. आयटीनगरीत जाण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून अभियंत्यांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास करावा लागतो. त्याचबरोबर विविध समस्यांना आयटीयन्सला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामावर परिणाम होत आहे. आयटी इंजिनिअरचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये परिसरातील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. त्यातील काही कंपन्या मगरपट्टा सिटी, चेन्नई, हैदराबाद अशा विविध भागांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.

हिंजवडी आयटीपार्कमधून बाहेर आल्यानंतर आयटी अभियंत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या कंपन्यामधे  येणारे पाहुणे किंवा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी त्यांना येण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. तसेच जवळपासच्या परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. येथील प्रश्नांबाबत राज्य शासनाचे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे, त्यावर उपयोजना होण्याची गरज आहे. अन्यथा आणखी कंपन्या बाहेर जातील. - कर्नल योगेश जोशी (सचिव, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन. )

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानEmployeeकर्मचारीMONEYपैसाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUnemploymentबेरोजगारी