शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

अपुरे ड्रेनेज व्यवस्थापन, नाल्यांवरील अतिक्रमण आणि बांधकामांतील दोषांमुळे भुयारी मार्गांत साचते पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:57 IST

निचऱ्याचा प्रश्न कायम : रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग काढल्याने दोन्ही बाजूने उतार; वाहतूक कोंडी, अपघात, पादचाऱ्यांना करावी लागते कसरत; नागरिकांना प्रचंड त्रास

रवींद्र जगधने

पिंपरी : शहरातील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गांमध्ये पावसाळ्यात पाणी साचणे नित्याचे बनले आहे. अपुरे ड्रेनेज व्यवस्थापन, नाल्यांवरील अतिक्रमण आणि बांधकामांतील दोषांमुळे भुयारी मार्गांत पाणी साचत आहे. निचरा होत नसल्याने पाणी साचून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी, अपघात आणि पादचाऱ्यांची कसरत रोजच पाहावी लागत आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास ही समस्या सुटू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

रावेत येथील शिंदे वस्ती, आकुर्डीतील धर्मराज चौक, बिजलीनगर येथील गुरुद्वारा चौक, पिंपरी साई चौकातील कै. किंमतराम आसवाणी भुयारी मार्ग आणि कासारवाडीतील शंकरवाडी या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचण्याची समस्या पावसाळ्यात नित्याचीच झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग काढल्याने दोन्ही बाजूने उतार तयार झाला आहे. त्यात अपुरे ड्रेनेज व्यवस्थापन, नाल्यांचे अतिक्रमण आणि बांधकाम दोष, अनियोजित शहरीकरण, हवामान बदल आणि मुसळधार पाऊस ही प्रमुख कारणे भुयारी मार्गात पाणी साचण्याची असल्याचे सांगितले जात आहे.

हे भुयारी मार्ग धोकादायक

रावेत येथील शिंदे वस्ती, आकुर्डीतील धर्मराज चौक, बिजलीनगर येथील गुरुद्वारा चौक, पिंपरी साई चौकातील कै. किंमतराव आसवाणी भुयारी मार्ग आणि कासारवाडीतील शंकरवाडी भुयारी मार्ग.

भुयारी मार्गात पाणी साचण्याची कारणे

- भुयारी मार्गांमधील गटारी आणि नाल्यांची नियमित स्वच्छता होत नाही. पावसाळ्यापूर्वी गटारीतील कचरा, गाळ आणि प्लास्टिक काढले जात नाही, ज्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो.- काही ठिकाणी रस्त्यांच्या बांधकामादरम्यान पाण्याच्या पाइपलाइन आणि ड्रेनेज लाइन फुटतात किंवा चुकीच्या पद्धतीने जोडल्या जातात. यामुळे पाणी भुयारी मार्गात साचते.

- शहराची वाढती लोकसंख्या आणि अनियोजित बांधकामांमुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा कमी झाल्या आहेत. यामुळे पावसाचे पाणी भुयारी मार्गांमध्ये जमा होते.- हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण आणि तीव्रता वाढली आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने ड्रेनेज व्यवस्था अपुरी पडते.

या आहेत उपाययोजना

- पावसाळ्यापूर्वी आणि भुयारी मार्गांमधील गटारी व नाल्यांची नियमित साफसफाई करणे गरजेचे.- भुयारी मार्गांमध्ये उच्च क्षमतेच्या पंप आणि स्वयंचलित ड्रेनेज यंत्रणा बसवाव्यात. यामुळे पाण्याचा त्वरित निचरा होईल.

- फुटलेल्या किंवा चुकीच्या जोडलेल्या पावसाच्या पाण्याच्या आणि ड्रेनेज पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती आवश्यक.- भुयारी मार्गांचे बांधकाम करताना पाण्याचा निचरा होईल अशी रचना करावी. तसेच, रस्त्यांचा उतार योग्य ठेवावा.

- पावसाळ्यापूर्वी सर्व भुयारी मार्गांची तपासणी करून पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी तात्पुरते पंप बसवावेत.- हवामान खात्याच्या अंदाजानुसार महापालिकेने पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे. त्यामुळे मुसळधार पावसाचा सामना करता येईल.

पिंपरी भुयारी मार्गात खड्डेच खड्डे

साई चौकातील कै. किंमतराव आसवाणी भुयारी मार्गात पाणी साचून राहिल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. मार्गातील बाजूच्या चऱ्या पाण्याखाली जातात. त्यामुळे अपघात होत आहेत.

आकुर्डी व गुरुद्वारा येथील भुयारी मार्गात प्रत्येक पावसाळ्यात हीच समस्या उद्भवते. पालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होईल. - रामेश्वर चव्हाण, नागरिक साधारण ७० ते १०० वर्षांपासून रेल्वेमार्गाखालून पाणी जावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने दगडी बांधकामांत मोऱ्या तयार केल्या होत्या. त्या मोऱ्या म्हणजे आताचे भुयारी मार्ग आहेत. शंकरवाडी, दळवीनगर, आकुर्डी, प्राधिकरण, देहूरोड येथे या मोऱ्या आहेत. मात्र, रेल्वेमार्गाच्या आसपासचे रस्ते जोडण्यासाठी हे भुयारी मार्ग सोयीचे आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य केले आहे. या मार्गात दोन्ही बाजूंना उतार असल्याने पावसाचे पाणी साचणे साहजिक आहे. मात्र, महापालिकेने पाणी वाहून नेण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेतून पावसाचे पाणी वाहून जाते. मोठ्या पावसात अर्धा-एक तास पाणी वाहून जाण्यास लागतो. - बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता, वाहतूक आणि परिवहन विभाग, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेWaterपाणी